• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवाजीनगरवासियांनी आयुक्तांना दिले समस्यांचे निवेदन…..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 15, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | धुळीमुळे होणार त्रास,काम न करणारे कर्मचारी, रस्त्यांबाबत सततच्या तक्रारी, यामुळे नागरिकांचा रोज वाढत असलेला त्रास या सर्वांचा पाढाच शिवाजी नगर वासियांनी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या समोर मांडला.

शिवाजीनगर रेल्वे पूल तुटल्यापासून शिवाजीनगरचा जळगाव शहराशी संबंधच तुटला आहे. कारण मनपातील अधिकाऱ्यांनी शिवाजी नगरमधील नागरिकांकडून फक्त कर घेण्यापुरता संबंध ठेवला आहे. वास्तविक पाहता शिवाजीनगर मध्ये जवळपास 70 ते 80 हजार लोक राहतात परंतु त्यामानने कमी सुविधा आहे. त्यातच सध्या अमृत योजनेमुळे रस्ते खोदले गेले असून धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. लहान मुले व ज्येष्ठांना याचा जास्त प्रमाणात त्रास होतोय म्हणून लवकरात लवकर आपण शिवाजी नगर मधील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे.

शिवाजीनगर मधील साफसफाईचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा असून या युनिटचे अधिकारी हे प्रत्येक वेळी एकच उत्तर देतात की आमच्याकडे मनुष्यबळ कमी असून आम्ही येऊ शकत नाही. आपण नागरिक म्हणून केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नाही संबंधित अधिकारी व कर्मचारी स्पष्टपणे कामचुकारपणा करतात असे दिसून येते. तरी अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्वरित बदली करण्यात येऊन तेथे कार्यक्षम अधिकारी व कर्मचारी नेमावेत जेणेकरून नागरिकांना स्वच्छतेचा प्रश्न उद्भवणार नाही. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आमच्या भागात गंभीर झालेला आहे. संपूर्ण शेवाळयुक्त पिवळे पाणी नागरिक पीत यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. शिवाजीनगर भाग हा विविध समस्यांनी घेतला गेला असून महानगरपालिका कडून शिवाजीनगर भागाला न्याय मिळत नसेल तर कृपया आम्हाला ग्रामीण भागामध्ये वर्गीकरण करण्यात यावे.

वरील समस्यांवर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास आम्ही शिवाजी नगर रहिवाशांकडून जन आंदोलन छेडण्यात येईल असे आशयाचे निवेदन देऊन शिववंदन फाउंडेशनचे अध्यक्ष विजय राठोड,उपाध्यक्ष विशाल वाघ,विनोद कोल्हे यांच्या सह नागरिकांनी सह्या केल्या आहे.

Tags: आयुक्तजळगावविद्या गायकवाडसमस्या
Previous Post

ऑक्टोंबर मध्ये काँग्रेसची देशव्यापी यात्रा : निवडून आल्यास EVM बंद करू, असा मोठा निर्णय…

Next Post

“१० वर्षाच्या कौटुंबिक वादाला कंटाळून, विवाहितेची गळफास घेत आत्महत्या”

Next Post

"१० वर्षाच्या कौटुंबिक वादाला कंटाळून, विवाहितेची गळफास घेत आत्महत्या"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!