• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

११२ नंबरमुळे अनर्थ टळला ; नवऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेचा मुलांसकट आत्महत्येचा प्रयत्न ….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 22, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love


जळगाव राजमुद्रा दर्पण | दारुड्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून मुलासह महिला आत्महत्या करायला निघाली होती. मात्र ११२च्या कॉल सुविधेमुळे पोलिसांचा आधार मिळाल्याने महिलेचे प्राण वाचले. ही घटना अमळनेर तालुक्यातील आटाळे येथे घडली.

अटाळे येथील स्वप्नील विठ्ठल पाटील हा पत्नी सोनाबाई पाटील (वय ३१) यांच्याकडे २१ रोजी सकाळी १२ वाजता मद्य पिण्यासाठी पैसे मागत होता. पत्नी पैसे द्यायला नकार देत असल्यामुळे त्याने सोनाबाईला मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच १० वर्षाचा मुलगा आदित्य व चार वर्षांची मुलगी योगिता यांनाही मारहाण केली.

वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. त्याचवेळी दीर सागर पाटील, सासू पुष्पाबाई पाटील, नणंद वैशाली भागवत पाटील यांनीही शिवीगाळ करून धमकी दिली. या संदर्भात सोनाबाई पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी रिक्षाने येत होती. मात्र, तिच्या पतीने तिला रिक्षात बसू दिले नाही. त्यामुळे सोनाबाईने पायी रस्ता धरून रस्त्यात एका विहिरीत दोन्ही मुलांसह आत्महत्येचा निर्णय केला. या वेळी तेथे असलेल्या एका व्यक्तीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती.

महिला दोन मुलांसह आत्महत्या करत असल्याचा प्रकार पाहून ११२ क्रमांकाला कॉल गेला. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तत्काळ दीपक माळी व रवींद्र पाटील या पोलिसांना घटनास्थळी पाठवले. ताेपर्यंत या महिलेला काही ग्रामस्थांनी थांबवून होते. दोन्ही पोलिसांनी तिचे मन परिवर्तन करून पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला. या प्रकरणी साेनाबाईच्या तक्रारीवरून मद्यपी पती, दीर, सासू व नणंद यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: आत्महत्याजळगावदारूपोलिसमहाराष्ट्रमहिलायावल
Previous Post

धक्कादायक ! केळी पिकाची होळी : ३ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज, एकावर संशय…

Next Post

विरोधक उमेदवारच नसल्याने ग्रामपंचायत सदस्यपदाची लागली लॉटरी….

Next Post

विरोधक उमेदवारच नसल्याने ग्रामपंचायत सदस्यपदाची लागली लॉटरी....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!