• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्याला चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यांसारखे संकट….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 25, 2022
in कृषी, जळगाव, महाराष्ट्र
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | केळी उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून कमालीचा अडचणीत सापडला आहे. गारपीट, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, कडक उन्हाळा अशा नैसर्गिक संकटांना तोंड देतांना रोगराई व बाजारपेठेतील चढउतारांना सामोरे जावे लागते.

केळीच्या जागतिक उत्पादनाच्या सुमारे २४.१८ टक्के उत्पादन भारतातले असते. भारतात अंदाजे २ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. भारतातील एकूण केळी पिकाखालील २३ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. केळीचे पीक घेणारे भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

केळी पिकासाठी राज्यात ७२ हजार हेक्टर जागा आहे. त्यापैकी सुमारे ४५ ते ५० हेक्टर क्षेत्र एकट्या जळगाव जिल्ह्यातच आहे. म्हणून जळगाव जिल्हाला केळीचे आगार मानले जाते. जळगाव केळीचे भरघोस उत्पन्न घेणारा जिल्हा म्हणून राज्यात लौकीक असून येथील केळीचा रंग आकार आणि चव पाहता येथील केळी ही निर्यातक्षम असल्याचे नेहमीच म्हटले जाते. जळगावच्या जैन इरिगेशच्या माध्यमातून टिश्यू कल्चर प्रणालीची केळीची रोपे केळी उत्पादकांना सहज उपलब्ध होत असल्याने केळी उत्पादन वाढण्यासाठी मोठी मदत होत आहे.जळगाव जिल्ह्यातून उत्तर प्रदेश, दिल्ली पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यासह सौदी अरेबिया, इराण, कुवेत, दुबई, जपान व युरोपमधील बाजारपेठेत केळी निर्यात केली जाते. मागील पाच-सात वर्षांपासून खान्देशी केळीला पाकिस्तानात चांगली बाजारपेठ मिळाली आहे. गेल्या दोन- तीन वर्षांत अरब राष्ट्रांत जिल्ह्यातील केळी निर्यात होत आहे.
समुद्रमार्गे इराक, इराण, दुबई, अफगाणिस्तान आदी देशांत केळीची निर्यात होत असते.

जिल्ह्यातून सरासरी ६०० कंटेनर केळी निर्यात केली जाते. एका कंटेनरमध्ये २०० क्विंटल म्हणजे २० टन केळी निर्यात होते. कंटेनर वातानुकूलित असतात. केळी काळजीपूर्वक हाताळून बॉक्सेस मध्ये भरून निर्यात केली जातात. गेल्या वर्षी जिल्ह्यातील सुमारे १५ कोटी रुपयांची बारा हजार टन केळी निर्यात झाली आहे.

Tags: उत्पादनकेळी पीकजळगावनैसर्गिक आपत्तीमहाराष्ट्र...शेतकरी
Previous Post

स्पाईस जेटवर रॅन्समवेअरचा हल्ला! उड्डाणे खंडित…

Next Post

महसूल राज्यमंत्री यांचे आदेश; वाळूठेकेदारांची जप्त केलेली अनामत परत मिळावी..

Next Post

महसूल राज्यमंत्री यांचे आदेश; वाळूठेकेदारांची जप्त केलेली अनामत परत मिळावी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!