• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘आपण काय बोलतोय याचं भान गरजेचं’, – संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना उत्तर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 5, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

(पुणे राजमुद्रा वृत्तसेवा) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी ‘आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे मोदींना पत्र लिहतील’ असा टोला लगावला होता. त्यावरुनच आता संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांनी आपण काय बोलतोय याचं भान ठेवणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

एक जून रोजी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये सगळ्याच गोष्टींसाठी राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत असल्याची टीका करताना चंद्रकांत पाटलांनी आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर निशाणा साधला होता. याचसंदर्भात राऊत यांना आज पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “चंद्रकांत पाटील म्हणजे काही वसंतदादा पाटील नाहीत. ते विरोधी पक्षाचे प्रमुख आहेत. ते त्याचं मत मांडू शकतात. पण व्यक्तीगतरित्या बोलताना प्रमुख पदावरील व्यक्तीने आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे. तुम्ही असं व्यक्तीगतरित्या कोणाकडे बोट दाखवाल तर काही बोटं तुमच्याकडेही वळलेली असतात हे लक्षात घ्यायला पाहिजे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

“सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे पंतप्रधांनांना पत्र लिहतील” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. महाविकास आघाडीला वाटतं की जनता मूर्ख आहे असंही ते यावेळी म्हणाले. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात मागास आयोग नाही. त्यामुळे इथं केंद्राचा काहीही संबंध नाही. पण हे सरकार कोडगं आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघायची असेल तेव्हा तुमच्या बघण्यातली दिल्लीतली कोण असेल तर सांगा म्हणून उद्धव ठाकरे पंतप्रधानांना पत्र लिहतील, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावर आज संजय राऊत यांनी निशाणा साधला.

Tags: aaditya thakrechandrakant patilmaharashtranarendra modipunesanjay raut
Previous Post

..तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल – नवाब मलिक यांचे मोठे वक्तव्य

Next Post

ट्विटर ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे वागत असल्याचा विश्व हिंदू परिषदेचा आरोप.

Next Post

ट्विटर ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे वागत असल्याचा विश्व हिंदू परिषदेचा आरोप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!