• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाकरे सरकारच्या ढोंगीपणामुळे आरक्षण गेलं – प्रवीण दरेकर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 5, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) मराठा समाजाच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून दीड वर्षाच्या काळात ढोंगीपणा आणि खोटारडेपणा करण्यात आला. मराठा समाजाला कायद्याद्वारे आरक्षण फडणवीस सरकारने दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवण्यासाठी परिस्थिती ५० टक्केच्या वर अपवादात्मक कशी आहे? हे दाखवून देणं गरजेचं होतं. पण या सरकारला ते जमलं नाही. आरक्षण रद्द झालं त्यामागे महाविकास आघाडी सरकारची निष्क्रियता आणि ढोंगीपणा जबाबदार आहे, असा घणाघात राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर केला. नवी मुंबईतील पनवेल येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल हे मान्यवर उपस्थित होते.

“मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं की नाही अशी शंका आता त्यांच्या मनात येऊ लागली आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत अंतिम सुनावणी न होता न्यायलायाने त्यास स्थगिती दिली. पण राज्य सरकारला आपली भूमिका मांडताच आली नाही. आरक्षण रद्द झाल्यानंतर यात विशेष लक्ष घातले जायला हवे पण तसे दिसत नाही. सरकार पूनर्विचार याचिका दाखल करणार आहे. त्या गोष्टीला इतके दिवस का लागले? खरं सांगायचं तर म्हणजे विषय समजून न घेता लोकांसमोर ढोंगीपणा कसा करावा हे महाविकास आघाडी सरकारने दाखवून दिलं आहे”, असे दरेकर म्हणाले.

“राज्यपालांकडे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पत्र देतात. राज्यपालांकडून पत्र पुढे जाण्यास कालावधी लागेल हे माहिती असलं पाहिजे. पण मूळ प्रक्रिया डावलायची आणि सर्व खापर केंद्रावर फोडत खोटं चित्र उभं करायचं अशी भूमिका ठाकरे सरकारची आहे. राज्यपालांना पत्र, पंतप्रधानांची भेट या गोष्टींसह ज्या मूळ कारणामुळे आरक्षण गेलं त्या कारणाच्या मूळाशी पोहोचणं अधिक गरजेचं आहे. ठाकरे सरकारने आता तिथून पुढची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. एकमेकांची उणीदुणी काढत भाजप आणि केंद्र सरकारला आरक्षणासाठी जबाबदार धरणं बोगसपणाचं लक्षण आहे. पण मी सांगतो की भाजप पूर्णपणे मराठा समाजाच्या मागे उभी आहे. त्यांना सहकार्य करायलाही तयार आहे. त्यामुळे केवळ हवेत पोकळ घोषणा किंवा वक्तव्ये करत मराठा समाजाची दिशाभूल करू नका”, असं दरेकर यांनी ठाकरे सरकारला सुनावलं.

“मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशनाची आमची मागणी आहे. वेगवेगळ्या टप्प्यावर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण, सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल, कोणाचं नेमकं काय चुकलं याची व्यापक चर्चा विधिमंडळात होऊ शकते आणि पुन्हा नव्याने आरक्षण देण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी चर्चा होऊ शकते. त्यामुळे अशाप्रकारचं अधिवेशन घेण्याची आवश्यकता आहे आणि ते लवकर घ्यावे”, अशी मागणीही दरेकर यांनी केली.

Tags: maharashtramaratha aarkshanmumbaipravin darekarthakre sarkar
Previous Post

ट्विटर ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे वागत असल्याचा विश्व हिंदू परिषदेचा आरोप.

Next Post

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या प्रदेश महासचिव पदी ज्येष्ठ लोकशाहीर गणेश अमृतकर

Next Post

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या प्रदेश महासचिव पदी ज्येष्ठ लोकशाहीर गणेश अमृतकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!