• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महत्वाचे! जर शिवसेनेने मांडलेला प्रस्ताव मान्य झाला तरच शिवसेना माघार घेणार….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 3, 2022
in राजकीय
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असून, दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेणे याबाबत अतिशय वेगवेगळ्या घडामोडी राजकारणात पाहायला मिळत आहे.

भाजपने या निवडणुकीत तीन उमेदवार मैदानात उतरवले आहे. तर, शिवसेनेने दोन उमेदवार दिले आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संख्याबळानुसार त्यांचे प्रत्येकी एक उमेदवार सहजरीत्या निवडून येण्याची शक्यता दिसते आहे.

जर निवडणुक झाली तर त्यामध्ये घोडेबाजी होईल, यामुळे आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तिसरा उमेदवार मागे घ्या असा प्रस्ताव समोर ठेवला. त्यावर भाजपने विधान परिषदेची एक जागा देऊन त्याबदल्यात राज्यसभेची एक जागा द्यावी असा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांसाठी शिवसेनेने नवा प्रस्ताव ठेवल्याची माहिती हाती आली आहे. शिवसेनेने राज्यसभेची दुसरी उमेदवारी मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्या बदल्यात शिवसेना विधान परिषदेच्या तीन जागा लढवणार आहे.

काँग्रेसला विधान परिषदेची जागा निवडून येण्यास अडचण आहे. त्यामुळे शिवसेना विधान परिषदेच्या तीन जागांचा विचार करत असून, शिवसेनेच्या या नव्या प्रस्तावावर नेते संजय राऊत दिल्लीतील काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
शिवसेनेचा प्रस्ताव मंजूर झाल्यास राज्यसभेचे उमेदवार संजय पवार यांना विधान परिषदेवर सोडण्यात येणार असल्याची माहितीही मिळाली आहे.

Tags: उमेदवारी अर्जकाँग्रेसभाजपमहाराष्ट्र.मुंबईराष्ट्रवादीशिवसेना
Previous Post

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरीनाची लागण; जगदीश ठाकूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती…

Next Post

भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या अमळनेर विधानसभा जागेबद्दल माहिती

Next Post
भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या अमळनेर विधानसभा जागेबद्दल माहिती

भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या अमळनेर विधानसभा जागेबद्दल माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!