• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईत पावसामुळे निर्माण परिस्थितीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक सरी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 9, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) रात्रीपासूनच सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र दिसत आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवरही पाणी आलं असून लोकलवसेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान यावरुन विरोधकांनी पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी तर सरकार आता पावसाची जबाबादारीही मोदींवर ढकलेल असा टोला लगावला आहे. अतुल भातखळकर यांनी मुंबईतील नालेसफाई आणि पावसाचे नियोजन यावरून पालिका आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल संतोष, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच इतर भाजपा नेत्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पावसाळ्यातील पालिकेच्या नियोजनाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मनपा किंवा राज्य सरकार आता बहुतेक पावसाची जबाबदारीसुद्धा मोदींवर ढकलतील आणि मोदींनीच यातून मार्ग काढावा म्हणतील. एवढं तरी म्हणू नये हीच आमची अपेक्षा आहे”. “मुंबईच्या आयुक्तांनी आम्हाला विचारलं तर आम्ही त्यांना भ्रष्टाचार कमी करुन आता तरी नालेसफाई नीट करा आणि पाणी साचण्याच्या जागा आहेत तेथील कामं पूर्ण करावीत असं सांगू,” असंही ते म्हणाले आहेत.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावर उत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “पावसाचं पाणी शहरात भरणारच नाही असा दावा कोणीही कधीच केला नव्हता. समुद्राचे दरवाजे बंद, सतत पाऊस सुरु यामुळे पाणी भरणार.. पुण्यातही तुंबलं आहे. पण चार तासाच्या वर शहरात पाणी राहत नाही. आत्ताही काही भागांमध्ये पाणी साचलेलं नाही, पाण्याचा निचरा झालेला आहे. मात्र, चार तासात निचरा झाला नाही तर मात्र आरोप योग्य आहे, चार तासाच्या वर पाणी शहरात थांबत नाही, त्यामुळे थोडं थांबणं गरजेचं आहे”.

मुंबईत नुकतेच मान्सूनच्या सरींचे आगमन झाले असतांना मुंबईत पावसामुळे निर्माण होणारी परिस्थिती राजकीय शाब्दिक सरींनाही प्रोत्साहन देणारी ठरते.

Tags: atul bhatkhalkarkishori pendnekarmonsoonmukhyamantri uddhav thakremumbainarendra modi
Previous Post

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे विशेष अधिकारी राम खांडेकर काळाच्या पडद्याआड

Next Post

विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात केवळ नोटिसा न देता सर्व अतिक्रमण समयमर्यादेत हटवावीत – सुनील घनवट

Next Post

विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात केवळ नोटिसा न देता सर्व अतिक्रमण समयमर्यादेत हटवावीत - सुनील घनवट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!