• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती : बळीराजाला मिळणार दिलासा

केळी पीक विम्याची रक्कम २-३ दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर येणार !

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 1, 2022
in कृषी, जळगाव, राजकीय
0
मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती : बळीराजाला मिळणार दिलासा
Spread the love

जळगाव मुंबई राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – हवामानावर आधारीत फळपिक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये शुक्रवारी रक्कम जमा होणार असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. हवामानावर आधारीत फळपिक विमा ज्या शेतकर्‍यांनी काढला आहे. याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आज पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यात केळी उत्पादकांना तब्बल ३३५ कोटी रूपये इतकी विम्याची रक्कम मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. तर, तालुका पातळीवर शेतकर्‍यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी समित्या नेमण्यात याव्यात असे निर्देश देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.

हवामानावर आधारीत फळपिक विमा ज्या शेतकर्‍यांनी काढला आहे. याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, विमा कंपनीचे प्रतिनिधी कुंदन बारी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याला ३३५ कोटींची नुकसानभरपाईची रक्कम जाहीर झाली असून, ती रक्कम शुक्रवारपासून शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

याप्रसंगी खरीप पीक विमा योजनेत अनेक शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम पडण्यास अडचणी येत असल्याने, याबाबत पीक विमा कंपनीसोबत चर्चा करून शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्याच्या सूचना गुलाबराव पाटील यांनी दिल्या. यासह हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतर्ंगत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांना नुकसानभरपाईपोटी ३३५ कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली असून, इतर जिल्ह्यांमधील शेतकर्‍यांनी ती रक्कम मिळाली आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अद्याप का मिळाली नाही ? यावर देखील गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत.

त्यानंतर पीक विमा कंपनीच्या प्रतिनीधींसोबत चर्चा केल्यानंतर, ही रक्कम शुक्रवारपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना व विशेष करून नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम साठी जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार शेतकर्‍यांनी सहभाग नोंदविला असून शेतकरी हप्ता पोटी रक्कम ३५ कोटी २३ लाखांची रक्कम भरण्यात आल्याची माहिती यावेळी कृषी विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांनी पीक विमा योजनेबाबत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई बाबत येणार्‍या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्र सुरु करण्याच्या सुचना यावेळी दिल्या.

जळगावातील रस्त्यांवरून ना. गुलाबराव पाटलांचा रूद्रावतार !

Tags: #banana#farmergulabrao patil
Previous Post

भाजपचा मोठा दाव; राज ठाकरे तोडणार उध्दव ठाकरेंची वोट बँक !

Next Post

जळगावातील रस्त्यांवरून ना. गुलाबराव पाटलांचा रूद्रावतार !

Next Post
जळगावातील रस्त्यांवरून ना. गुलाबराव पाटलांचा रूद्रावतार !

जळगावातील रस्त्यांवरून ना. गुलाबराव पाटलांचा रूद्रावतार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!