• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात खळबळजनक घटना; 17 तासात 4 खून 1 बलात्कार, कायदा सुव्यवस्था संपली ?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 2, 2022
in क्राईम
0
राज्यात खळबळजनक घटना; 17 तासात 4 खून 1 बलात्कार, कायदा सुव्यवस्था संपली ?
Spread the love

अमरावती राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – एकीकडे राज्यात मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे अमरावती जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उठवला जात आहे. गेल्या 17 तासात येथे 4 खून व एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या परिस्थितीचे हे गांभीर्य पाहता स्थानिक नागरिक दहशतीत जगत आहेत. अमरावती जिल्ह्यात दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू असतानाच मेळघाटातील सुसरडा गावात सख्ख्या भावाची हत्या भावानेच केल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी गावात शोककळा पसरली होती. पोलिसांनी मारेकरी भावाला अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे. अखेर दोन्ही भावांमध्ये तणाव इतका वाढला की भावानेच भावावर हल्ला करून त्याची हत्या केली, याप्रकरणी तपास सुरू आहे. आज (शुक्रवार, 2 सप्टेंबर) गणेश उत्सवाचा तिसरा दिवस असून अमरावतीतील हा रक्तपात पाहून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण परिसरात दहशदीचा वातावरण निर्माण झाले आहे.

17 तासांत 4 खून करून पोलिसांनाही हादरवून सोडले :-
अमरावती जिल्ह्यात अवघ्या 17 तासांत एकामागून एक चार खून झाल्याच्या घटनांमुळे पोलीसही हादरून गेले आहेत. दरम्यान, महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलीस त्यांचा तपास करत आहे, दरम्यात काही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्रथम, अमरावती शहरात गेल्या 17 तासांत दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर मेळघाटातील सुसरडा गावात भावानेच भावाची हत्या केली. त्यामुळे सुसरडा गाव पूर्णपणे हादरले. या घटना ताज्या होत्या की, शेतात बैल चारण्यावरून वाद इतका वाढला की संबंधित महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. महिलेवर बलात्कार करून खून झाल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये प्रचंड राग असून आरोपींना लवकर पकडण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव आहे. अचानक घडलेल्या या घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Tags: #killing#police case#rapamravaticrimemurder
Previous Post

‘त्या’ मनसे पदाधिकाऱ्याची अखेर पक्षातून हकालपट्टी

Next Post

10वी-12वी पाससाठी विमानतळावर सरकारी नोकरींची भरती.

Next Post
10वी-12वी पाससाठी विमानतळावर सरकारी नोकरींची भरती.

10वी-12वी पाससाठी विमानतळावर सरकारी नोकरींची भरती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!