• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात गुलाबी थंडीत राजकारण तापले; नेत्यांच्या हायव्हेल्टेज ड्रामामुळे जनता हैराण

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 22, 2022
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव : जिल्ह्यात गुलाबी थंडीमुळे हवामानाचा पारा कमालीचा घटला आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय चढाओढीमुळे राजकारण मात्र तापले आहे. यामागील कारण म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे व भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण अधिक पेट घेताना दिसत आहे. एकमेकांच्या व्यक्तिगत पातळीवर टीका टिपण्णीमुळे राजकारण ढवळून निघाले आहे.

राज्याचे ग्रामविकासमंत्री असलेले गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या मुलाची आत्महत्या की खून? याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणी तपास झाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मात्र एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजन यांचा समाचार घेत असताना हा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे नीच हलकट प्रवृत्तीचे दर्शन असल्याचे म्हटले आहे आहे. तुम्हाला जर चौकशी करायची असेल तर खुशाल चौकशी करा, मी त्यांच्या व्यक्तिगत परिवाराबद्दल आजपर्यंत कधीच बोललेलो नाही त्यांनी घराणेशाहीचा आरोप केला होता म्हणूनच गिरीश महाजन यांच्या पत्नी गेल्या 25 वर्षापासून सत्तेची पदे उपभोगत असल्याचे बोलले होते. मात्र गिरीश महाजन आणि थेट माझ्या स्वर्गवासी मुलाच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केल्याने प्रचंड वेदना झाल्याचे खडसेंनी म्हंटले आहे.

खालावलेल्या राजकारणामुळे नागरिकांमध्ये संताप

आता राजकारणातील वार-पलटवार थेट परिवारापर्यंत जाऊ लागल्याने सर्व सामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दोन दिग्गज व अनुभवी नेते असताना राजकारणातील मर्यादा बाळगणे गरजेचे आहे. मात्र दोन्ही नेते थेट व्यक्तिगत वार करीत असल्याने खुनशीचे राजकारण सुरू असल्याचे सध्या जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. यात सर्वसामान्य जनता देखील भरडली जात असून विकासापासून नागरिक मात्र वंचित आहे. व्यक्तिगत टीकांमधून त्यांना वेळ मिळाला तर त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी विकासाकडे लक्ष द्यावे अशी कळकळ नागरिकात बदल व्यक्त होत आहे.

Tags: eknath khadasegirish mahajanjalgaon politics
Previous Post

शिंदे सरकार 2 महिन्यांत पडणार: भाजप मंत्र्याच्या संकेतानंतर संजय राऊत यांचा दावा

Next Post

भुसावळातील बँकेत 1 कोटींचे सोने चोरी, मॅनेजर फरार

Next Post

भुसावळातील बँकेत 1 कोटींचे सोने चोरी, मॅनेजर फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!