• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलीस भरती: आता हवालदार पदासाठी तृतीयपंथीही अर्ज भरू शकणार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 10, 2022
in महाराष्ट्र
0
Spread the love

मुंबई : पोलिस हवालदार पदासाठी तृतीयपंथी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकणार आहेत. त्यासाठी राज्य सरकार अर्जात सुधारणा करणार असून ‘लिंग’ या श्रेणीत तृतीयपंथी या पर्यायाचा समावेश करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी पुढील वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत निकष ठरविण्यात येतील, अशी माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली.

पोलिस हवालदार पदासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी भरती प्रक्रियेत तृतीयपंथींसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत अपयशी ठरल्याप्रकरणी राज्य सरकारची उच्च न्यायालयाने कानउघाडणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी या मुद्द्यावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकार ऑनलाइन अर्जात सुधारणा करणार आहे. ‘लिंग’ या श्रेणीत तृतीयपंथींचाही समावेश करणार आहे. त्याशिवाय सध्याच्या भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठी दोन पदे राखीव ठेवण्यात येणार आहेत, असे न्यायालयाला सांगितले.

राज्य सरकार नियम तयार करणार

राज्य सरकार २८ फेब्रुवारीपर्यंत नियम तयार करेल आणि त्यानंतरच शारीरिक, लेखी चाचणी घेण्यात येईल, असा आदेश न्यायालयाने दिला. गृह विभागाच्या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी भराव्या लागणाऱ्या अर्जात महिला व पुरुष, असे दोनच पर्याय असतात. या दोन पर्यायांबरोबर तृतीयपंथींसाठीही पर्याय उपलब्ध करावा, यासाठी दोन तृतीयपंथींनी मॅटमध्ये याचिका केली. त्यावर मॅटने राज्य सरकारला तृतीयपंथींसाठी पर्याय उपलब्ध करण्याचा आदेश दिला.

अशी होणार निवड

या आदेशाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तृतीयपंथींसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. १३ डिसेंबरपर्यंत तिसरा पर्याय उपलब्ध करण्यात येईल. तर शारीरिक चाचणी निकष निश्चित केल्यानंतर घेण्यात येईल व त्यानंतरच लेखी परीक्षा घेण्यात येईल

Tags: #police bhartijobmaharashtra police
Previous Post

आता लागा तयारीला! दहावी, बारावी परीक्षा नियमात बोर्डाने केले बदल

Next Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय! चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम लागू होणार

Next Post
राज्य सरकारचा मोठा निर्णय! चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम लागू होणार

राज्य सरकारचा मोठा निर्णय! चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम लागू होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!