• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य सरकारचा मोठा निर्णय! चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम लागू होणार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 10, 2022
in महाराष्ट्र
0
राज्य सरकारचा मोठा निर्णय! चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम लागू होणार
Spread the love

मुंबई: देशात उच्च शिक्षण घेताना कुठल्याही शाखेची पदवी मिळवण्यासाठी साधारण 3 वर्षांचा कालावधी लागतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आता या शैक्षणिक रचनेत अनेक बदल केले जात आहेत. महाराष्ट्रातदेखील पदवीच्या शिक्षणात लवकरच बदल होणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षांचा कौशल्यांवर आधारित पदवी अभ्यासक्रम राबवण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व विद्यापीठांना दिले आहेत.

‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं जीआर काढला असून, यासंबंधी सर्व विद्यापीठांना नियमावली तयार करण्यास सांगितलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यातील शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. आता या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीनुसार अंमलबजावणीच्या अनुषंगाने, तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासोबत चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या आराखड्याची अंमलबजावणी पुढील वर्षीपासून करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केल्या आहेत.

कसा असणार नवा अभ्यासक्रम?

– विद्यार्थ्याला पदवी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक वर्षानंतर या चार वर्षांच्या अभ्यासक्रमातून बाहेर पडण्याचा किंवा सोडण्याचा पर्याय मिळेल.

– पदवीचं पहिलं वर्ष पूर्ण केल्यानंतर बाहेर पडल्यास विद्यार्थ्याला फक्त प्रमाणपत्र मिळेल. दोन वर्षांनी बाहेर पडल्यास डिप्लोमा प्रमाणपत्र, तीन वर्षांनी बाहेर पडल्यास बॅचलर डिग्री आणि चार वर्षं पूर्ण केल्यानंतर ऑनर्स किंवा संशोधनाची बॅचलर डिग्री मिळेल.

– अंतिम वर्ष वगळता आणि ब्रिज कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ही सुविधा घेणं शक्य होईल. यामुळे विद्यार्थ्याला रोजगार कौशल्यांमध्ये प्रशिक्षण मिळवण्यास मदत होईल.

– विद्यार्थी एकूण सहा सेमिस्टरपैकी दोन सेमिस्टर निवडू शकतील. जर एखाद्यानं पहिल्या सेमिस्टरमध्ये कोर्समध्ये प्रवेश घेला तर त्याला दुसरं सेमिस्टर पूर्ण केल्यानंतरच कोर्समधून बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल.

– तिसऱ्या सेमिस्टरमध्ये कोर्समध्ये प्रवेश करणाऱ्याला चौथं सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर कोर्स सोडण्याची परवानगी दिली जाईल. हाच नियम पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरसाठी लागू असेल.

Tags: degreeeductaiongraduation
Previous Post

पोलीस भरती: आता हवालदार पदासाठी तृतीयपंथीही अर्ज भरू शकणार

Next Post

जळगाव दूध संघासाठी मतदान सुरु; दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Next Post

जळगाव दूध संघासाठी मतदान सुरु; दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!