• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना दुप्पट मदत मिळणार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 15, 2022
in कृषी, महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना दुप्पट मदत मिळणार
Spread the love

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये प्रती हेक्टर दुप्पट वाढ करण्यात आली आहे. यामुळे जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये मिळणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात जून ते ऑक्टोबर महिन्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागांमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांना या नुकसानीमुळे प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं. राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झाली होती. पण आता शिंदे-फडणवीस सरकारने त्या मदतीची रक्कम दुप्पट केली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

किती मिळणार मदत?

राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाने नुकसान भरपाईची मदत दुप्पट करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आतापर्यंत जिरायतीच्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना 6 हजार 800 रुपये प्रती हेक्टर मदत मिळत होती. पण आता हीच मदत 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर इतकी मिळणार आहे. दुसरीकडे बागायती पिकांच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 प्रती हेक्टर मदत आतापर्यंत दिली जात होती. पण यापुढे हीच मदत 27 हजार प्रतिहेक्टर देण्यात येणार आहेत.

3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार

बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 18 हजार प्रती हेक्टर मदत दिली जात होती. पण आता यापुढे ही मदत 36 हजार रुपये प्रती हेक्टर देण्यात येणार आहे. एवढच नाही तर शाससाने नुकसानीची मर्यादाही वाढवली आहे. 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीत नव्याने उभं राहण्यासाठी नक्कीच काहीतरी हातभार लागणार आहे.

Tags: crop damagefarmer reliefHeavy rains
Previous Post

स्वस्तात शेअर खरेदी करण्याची संधी! IRCTC चा 5 टक्के हिस्सा सरकार विकणार

Next Post

जिल्हाधिकारी रजेवर ; प्रांताधिकारी ,तहसीलदारांना दिसत नाही का ?

Next Post

जिल्हाधिकारी रजेवर ; प्रांताधिकारी ,तहसीलदारांना दिसत नाही का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!