• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव तालुक्यातील रस्ते चकाकणार, रस्त्यांसाठी २२ कोटींचा निधी मंजूर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 13, 2023
in जळगाव
0
Spread the love

जळगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान ग्रामसडक योजना (टप्पा ३) अंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील  २६ किमीच्या रस्त्यांसाठी २२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारच्या वेळकाढूपणामुळे रखडलेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजना (टप्पा ३) च्या कामाला भाजपा – सेना युती सरकारने गती दिली असून अवघ्या दोन महिन्यात केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यासाठी २०३९ कोटींच्या निधीतून २५५१ किमीच्या रस्त्यांना मान्यता मिळाली आहे. त्यात केंद्र शासनाचा १२१८ कोटी व राज्य शासनाचा ८२१ कोटी असा सहभाग असणार आहे.

अर्थसंकल्पात ६ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर

चाळीसगाव मतदारसंघातील पातोंडा – वाघडू -रांजणगाव – राष्ट्रीय महामार्ग २११ (१०.४३ किमी) आणि  शिंदी – हिरापूर – अंधारी – तमगव्हाण (१५.९४ किमी) या दोन रस्त्यांचा समावेश आहे. त्यातील हिरापूर – अंधारी – तमगव्हाण या रस्त्याला काही दिवसांपूर्वीच अर्थसंकल्पात ६ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याची निविदा देखील निघाली आहे. मात्र सदर रस्त्याची तातडीने सुधारणा होणे गरजेचे असल्याने त्याऐवजी रस्त्याचा पुढील भाग या कामात समाविष्ट करण्यात यावा अशी देखील शिफारस शासनाकडे करणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

आमदार चव्हाण यांनी मानले आभार

पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत सदर दोन्ही रस्त्यांसाठी २२ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल आमदार चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आदींचे मनःपूर्वक आभार मानले आहे.

Tags: chalisgaon news
Previous Post

भरधाव डंपरच्या धडकेत एस. टी. कर्मचारी ठार, जामनेर शहरातील दुर्घटना

Next Post

प्रत्येक युवतीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता ! – सायली पाटील

Next Post

प्रत्येक युवतीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता ! - सायली पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!