• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या, नापिकीमुळे संपविले जीवन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 18, 2023
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव : जळगाव तालुक्यातील करंजा येथील तरूण शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीतून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी १८ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

शरद जगन्नाथ पाटील (वय-३९) रा. करंजा ता.जि.जळगाव असे मृत तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, शरद पाटील हे शेतकरी पत्नी व दोन मुलांसह जळगाव तालुक्यातील करंजा येथे वास्तव्याला होते. शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. शेतात मका आणि केळीची लागवड केली आहे.

सोसायटी आणि पीक कर्ज घेतले

यासाठी त्यांनी सोसायटी आणि पीक कर्जच्या माध्यमातून शेती केली होती. सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीतून ते सतत विवंचनेत होते. बुधवारी १८ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. पत्नी अनिता ह्या सकाळी उठल्यावर हा प्रकार दिसून आल्याने त्याना धक्का बसला.

पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या मदतीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी अनिता, लोकश आणि सुमित हे दोन मुले, लहान भाऊ प्रदीप असा परिवार आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Tags: crimejalgaon news
Previous Post

कपाशीच्या हमीभावासाठी राष्ट्रवादी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Next Post

आयकर विभागाने दिला इशारा; 31 मार्चपर्यंत हे काम करा, अन्यथा पॅनकार्ड होणार रद्द

Next Post
आयकर विभागाने दिला इशारा; 31 मार्चपर्यंत हे काम करा, अन्यथा पॅनकार्ड होणार रद्द

आयकर विभागाने दिला इशारा; 31 मार्चपर्यंत हे काम करा, अन्यथा पॅनकार्ड होणार रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!