• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा: मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी महामंडळाने घेतला मोठा निर्णय

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 28, 2023
in महाराष्ट्र
0
Spread the love

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या काही प्रमुख मागण्यांसाठी 2021 मध्ये दीर्घकाळ संप केला होता. याकाळात कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले होते, त्यामुळे 124 कर्मचाऱ्यांनी त्यांचे जीवन संपवले होते. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटूंब उघड्यावर पडले होते. आता या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

एसटी संपकाळातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. संप काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आता नोकरी मिळणार आहे. राज्यातील परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील 124 मृत एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना नोकरी मिळणार आहे.

124 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. जवळपास तीन महिने हा संप चालला होता. यादरम्यान, कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं. संप काळात 124 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांचा संपकाळात मृत्यू झाला, आता त्यांच्या जागी वारसांना नोकरी देण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्याच कर्मचाऱ्यांच्या जागेवरती नोकरी मिळणार आहे. विशेष म्हणजे या वारसांना सेवासलगतेचाही लाभ मिळणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ

मार्च 2022 मध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास सुरुवात केली. संपकाळात पगाराविना आर्थिक संकटापुढे टिकाव न धरू शकलेल्या 124 अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. जवळपास चार महिने एसटी सेवा ठप्प होती. तरीही एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी मान्य झाली नव्हती. परंतु, सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांची वाढ केली होती.

Tags: St bus
Previous Post

मोठी दुर्घटना: राजस्थान आणि मध्यप्रदेशात दोन विमानं कोसळली

Next Post

चाळीसगावात गोवंश तस्करी रोखली; संतप्त जमावाने वाहन पेटवल्याने तणावाची परिस्थिती

Next Post
चाळीसगावात गोवंश तस्करी रोखली; संतप्त जमावाने वाहन पेटवल्याने तणावाची परिस्थिती

चाळीसगावात गोवंश तस्करी रोखली; संतप्त जमावाने वाहन पेटवल्याने तणावाची परिस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!