• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे गट हीच खरी शिवसेना; महापौरांच्या टीकेवर निलेश पाटील यांचा पलटवार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 3, 2023
in Uncategorized
0
शिंदे गट हीच खरी शिवसेना; महापौरांच्या टीकेवर निलेश पाटील यांचा पलटवार
Spread the love

जळगाव : महापौर जयश्री महाजन यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या आमदारांवर गद्दारी केल्याचे आरोप केले आहेत. यावर आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी पलटवार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना हीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सर्व आमदार हेच खरे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे नेते आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार हे बाळासाहेबांचे विचार पुढे टीकावे म्हणूनच कॉग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना हीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना असल्याचे निलेश पाटील यांनी सांगितले आहे.

महापौरांनीच बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली

महापौर जयश्री महाजन या एकनाथ शिंदे यांच्या जोरावरच महापालिकेत महापौर झाल्या. महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला तो केवळ एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामुळेच, त्यामुळे महापौरांनी यांचे उपकार जाणून, त्यांच्यासोबत न येता, ठाकरे गटात राहिल्या. महापौरांनीच बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. त्यामुळे महापौर जयश्री महाजन यांनी निष्ठेचे धडे न देता, जळगावकरांना सुविधा कशा दिल्या जातील याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

जळगावकरांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे

महापौर जयश्री महाजन यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या आमदारांवर टीका करण्याआधी महापालिकेत सत्ता कोणामुळे आली, महापौरपद कोणाकडे मिळाले याकडे अधिक लक्ष द्यावे. जळगावकरांचा विकास न करता आल्यानेच महापौर आता प्रसिध्दीसाठी केव्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टिका करतात, तर केव्हा मुख्यमंत्रीसाहेबांवर टीका करतात. महापौरांनी टीका-आरोपात न राहता, जळगावकरांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे.

 

Previous Post

भाजपला मोठा धक्का! अमरावती पदवीधरमध्ये मविआचे उमेदवार धीरज लिंगाडेंचा विजय

Next Post

अखेर..! आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकरीता आदेश आला; काय आहे जाणून घ्या…

Next Post
अखेर..! आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकरीता आदेश आला; काय आहे जाणून घ्या…

अखेर..! आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकरीता आदेश आला; काय आहे जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!