• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी: पहाटेच्या शपथविधीवरुन देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 13, 2023
in Uncategorized
0
मोठी बातमी: पहाटेच्या शपथविधीवरुन देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Spread the love

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडून भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. असे असले तरी पहाटेच्या शपथविधीवरून आता भाजपकडून वेगवेगळे खुलासे केले जात आहे. भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पहाटेच्या शपथविधी’वर सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावरून राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना हा गौप्यस्फोट केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच पहाटेचा शपथविधी झाला होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. इतकंच नाही तर महामंडळाच्या वाटपाबाबतही पवारांशी चर्चा केली होती आणि खातेवाटपाबाबतही पवारांशी बोलणं झालेलं होतं, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीकडून सरकार स्थापनेचा प्रस्ताव

2019च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचालींवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलासा केला. ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याबाबतची चर्चा सुरु होती. ती चर्चा पुढे जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. याचदरम्यान आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

माझा दोंन्हीकडून विश्वासघात

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. आमच्यासोबत निवडून आले. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. उद्धव ठाकरेंची काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु असताना आम्हाला राष्ट्रवादीकडून ऑफर आली. म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर कशा बदलल्या आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाल्याचे फडणवीस म्हणाले.

Previous Post

धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगावातील तरुणाचा मृत्यू

Next Post

जामनेरजवळ मोठा अपघात; डंपर पलटल्याने एक ठार, दोन जखमी

Next Post
मुक्ताईनगरात भीषण अपघात : मोटरसायकलच्या धडकेत दोघे तरुण ठार

जामनेरजवळ मोठा अपघात; डंपर पलटल्याने एक ठार, दोन जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!