• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा-राष्ट्रवादीची युती होणार; ‘या’ राज्यात आमदारांनी दिला पाठिंबा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 8, 2023
in Uncategorized
0
भाजपा-राष्ट्रवादीची युती होणार; ‘या’ राज्यात आमदारांनी दिला पाठिंबा
Spread the love

नवी दिल्ली : नागालँडमध्ये भाजपसोबत युती करून NDPP पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे आणि सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी राज्यात विरोधकांशिवाय सरकार स्थापन होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि जेडीयूसह सर्व राजकीय पक्ष भाजप आघाडीला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार आहेत.

नागालँड विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक संख्येने राजकीय पक्ष सहभागी होत असतानाही, नागालँडमधील नवीन सरकार विरोधक विरहित सरकारकडे वाटचाल करत आहे. यामध्ये जवळपास सर्वच पक्षांनी एनडीपीपी-भाजप युतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. एनडीपीपी आणि भाजपने 2 मार्च रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये अनुक्रमे 25 आणि 12 जागा जिंकल्या आणि 60 सदस्यांच्या सभागृहात युतीची एकूण संख्या 37 झाली.

राष्ट्रवादीने केली घोषणा

तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सात आमदारांसह भाजप आघाडीत सामील होण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार वाय मोहनबेमो हमत्सो यांनी रविवारी पीटीआयला ही माहिती दिली. याशिवाय एनपीपीने पाच, एलजेपी (रामविलास), नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) आणि आरपीआय (आठवले) प्रत्येकी दोन, जद (यू) एक आणि अपक्ष चार जागा जिंकल्या आहेत. एनडीपीपी-भाजपने अद्याप सरकार स्थापनेचा दावा केला नसला तरी, त्यांना त्यांची दुसरी टर्म सुरू ठेवण्यासाठी इतर राजकीय पक्षांकडून बिनशर्त पाठिंबा मिळाला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार

राज्यातील इतर छोट्या पक्षांनी NDPP आणि भाजपासोबत सत्तेत जाण्यासाठी पाठिंबा दिला आहे. नागालँडचे राष्ट्रवादी प्रभारी नरेंद्र वर्मा याबाबत पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत त्यानंतरच यावर अंतिम निर्णय होऊ शकतो. नागालँडच्या स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांचा कल सत्तेत सहभागी होण्याचा आहे. विरोधी पक्षात बसण्याऐवजी जर राष्ट्रवादीने भाजपासोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर त्याचे पडसाद महाराष्ट्रातील राजकारणावरही होतील. कारण राष्टवादीच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत संशयाचं वातावरण निर्माण होऊ शकते.

Previous Post

कोरोनासारखा पसरतोय ‘हा’ विषाणू; जाणून घ्या लक्षणं आणि बचावात्मक उपाययोजना

Next Post

मोठी बातमी ! आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

Next Post
मोठी बातमी ! आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

मोठी बातमी ! आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!