• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आम्ही पवारांना घाबरतो, त्यांच्यासारखी बुद्धी कोणाचीही चालत नाही: गुलाबराव पाटलांची टोलेबाजी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 15, 2023
in Uncategorized
0
आम्ही पवारांना घाबरतो, त्यांच्यासारखी बुद्धी कोणाचीही चालत नाही: गुलाबराव पाटलांची टोलेबाजी
Spread the love

जळगाव: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री गुलाबराव पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात खटके उडाल्याचे पहायला मिळाले होते. यानंतर गुलाबराव पाटील यांनी पुन्हा अजित पवारांवर टीका केली आहे. पवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना घाबरून असतो, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार आणि अजित पवारांना टोला लगावला.

गुलाबराव पाटील आपल्या रांगड्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. ते कधी कोणाची टोपी उडवतील याचा नेम नसतो. त्याचाच प्रत्यय जळगावमधल्या विवाह सोहळ्यात आला. वधूचे घरचे आडनाव पवार होते. हाच धागा गुलाबराव पाटलांनी हेरला. ते म्हणाले, पवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना घाबरून असतो. ते सकाळी-सकाळी कधी शपथ घेतील आणि काय करून टाकतील याचा नेम नसतो. त्यांच्या बुद्धीपुढे कोणाचेही चालत नाही. त्यामुळे त्यांना नेहमी सोबत ठेवतो, असा चिमटा त्यांनी काढला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

५० खोके-नागालँड ओके…

राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये एनडीपीपी आणि भाजप सरकारला पाठिंबा दिला. यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुलाबराव पाटील यांनी ५० खोके, नागालँड ओक्के… अशी घोषणाबाजी केली होती. या देशात आणि राज्यात बदलेचा वारे वाहायला लागल्याची वक्तव्ये मी वर्तमानपत्र आणि टीव्हीवर ऐकली. नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याचंही मी पाहिलं. मलासुद्धा असं वाटतं की नागालँडमध्ये ५० खोके-सबकुछ ओक्के झालंय का? अशी शंका निर्माण झालेली आहे. एकीकडे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे, तिकडे जाऊन मांडीला मांडी लावून बसायचं, हे राष्ट्रवादीलाच जमू जाणं. पण खरंच नागालँडमध्ये ५० खोके, सबकुछ ओक्के असं झालंय का? असा सवाल करत गुलाबरावांनी डिवचल्यानंतर अजित पवारांच्या संतापाचा पारा चढल्याचे पहायला मिळाले होते.

Previous Post

नोकरीची संधी! राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. बारामती आणि BECIL मध्ये भरती

Next Post

रात्री फिरण्यासाठी जाणे पडले महागात; रस्त्यात अडवून रेल्वे कर्मचाऱ्याची लुटमार

Next Post
धावत्या बसमधे महिला कंडक्टरचा विनयभंग; प्रवाशाविरुध्द गुन्हा दाखल

रात्री फिरण्यासाठी जाणे पडले महागात; रस्त्यात अडवून रेल्वे कर्मचाऱ्याची लुटमार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!