• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मी गुवाहाटीसह सुरतही तपासलं, पण मंत्री तिथेही नाहीत, मग गेले कुठं? खडसेंचा खोचक टोला

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 20, 2023
in Uncategorized
0
मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र, एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ
Spread the love

मुंबई : मागच्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि काल झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे अद्याप झाले नाहीत. सरकार संवेदनशील नाही. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा स्थितीत एकही मंत्री दिसत नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस आमदार एकनाथ खडसे यांनी केलं. मी गुवाहटीला तपासलं पण तिथेही मंत्री दिसले नाहीत. सुरतला तपासलं तिथेही मंत्री नाहीत. मग मंत्री आहेत कुठं? असा खोचक टोला एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. ते विधानपरिषदेत बोलत होते.

सरकार सातत्यानं सांगत आहे की मागच्या सरकारने हे केलं आणि आता आमळी पावसाने आणि गारपिटीमुळं च्या सरकारनं हे केलं. मागच्या सरकारमधील निम्मे मंत्री इकडे आहेत. त्यावेळी तुम्ही म्हणता त्यांनी चुका केल्या मग तुम्ही देखील त्याला जबाबदार असल्याचे खडसे म्हणाले. मागील 15 दिवसांपासून राज्यात अवकामोठ्या प्रमाणात झालं आहे. अजुन मंत्री बांधावर गेले नाहीत. मग मंत्री आहेत तर कुठं? असा सवाल एकनाथ खडसेंनी केला. मी गुहाटीला चौकशी केली तर तिथं नाहीत असं कळलं मग गुजरातलां पण चौकशी केली तिथं देखील नसल्याचं सी आर पाटील यांनी सांगितलं. मग हे गेलेत कुठं? असा खोचक टोला एकनाथ खडसेंनी लगावला.

शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करा

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अजुनही पंचनामे नाहीत. मंत्री लक्ष देत नाहीत. आता तलाठी कामावर नाहीत. मग पंचनामे कोण करणार? असा सवाल एकनाथ खडसेंनी विधानपरिषदेत उपस्थित केला. नुकसान होऊन 15 दिवस झालं. पंचनाम्यासाठी अधिकारी गेले नसतील तर शेतकऱ्यांनी नुकसान झालेलं पीक तसेच ठेवायचं का? जर त्याने साफ केले तर हे परत म्हणतील की नुकसान झालं नाही. त्यामुळं नकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी अशी आमची मागणी असल्याचे खडसे म्हणाले.

शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा

शेतकऱ्यांचं हजारो कोटींचे कर्ज माफ करा. निरव मोदी सारखे लोकं पैसै बुडवून गेले मग तुम्ही इथ असलेल्या शेतकऱ्यांवर अनन्या करु नका, असेही खडसे म्हणाले. शेतकऱ्यांची संपूर्णपणे कर्जमाफी करा, खतांचे भाव कमी करा. कापसाला अजून अनुदान दिलेलं नाही ते तात्काळ द्या. मागच्या सरकारनं काय केलं ते जाऊ द्या तुम्ही काय दिवे लागले ते सांगा असेही खडसे म्हणाले.

Previous Post

चाकूहल्ल्यातील तरुणाचा मृत्यू : यावल तालुक्यातील घटना

Next Post

अमृता फडणवीस लाच प्रकरण! बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक

Next Post
अमृता फडणवीस लाच प्रकरण! बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक

अमृता फडणवीस लाच प्रकरण! बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!