• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अदानींच्या कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी कोणाचे? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाना

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 25, 2023
in Uncategorized
0
अदानींच्या कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी कोणाचे? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाना
Spread the love

नवी दिल्ली : राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. याप्रकरणी काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. या मुद्द्यावर आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. लोकसभेतून अपात्र ठरल्याबद्दल ते म्हणाले की, सध्या सरकार घाबरून जी कारवाई करत आहे त्याचा फायदा विरोधकांना होईल. यासोबतच अदानीचा मुद्दा दडपण्यासाठी सरकार विरोधी नेत्यांवर कारवाई करते, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, भारतीय लोकशाहीवर वेळोवेळी हल्ले होत आहेत. ते म्हणाले की, मी कोणाला घाबरत नाही. मी भारतातील लोकांचे आणि लोकशाहीचे रक्षण करत राहीन. आपल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी या भाजपच्या मागणीवर राहुल यांनी स्पष्टपणे सांगितले की, गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत. मी माफी मागणार नाही. मी सावरकर नाही.

अदानींच्या मुद्द्यावरुन लक्ष हटविण्याचा प्रयत्न

अदानीबाबत मी सरकारला प्रश्न करेन, मला अपात्र ठरवून किंवा तुरुंगात टाकूनही सरकार मला धमकावू शकत नाहीत. अदानीच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा सारा खेळ खेळला जात आहे. सरकारसाठी देश फक्त अदानी आहे आणि अदानी फक्त देश आहे. अदानी सर्वात भ्रष्ट, मोदीजी त्याला का वाचवत आहेत? मी विचारतो, अदानीच्या कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी कोणाचे? असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी केला.

विरोधकांसोबत एकत्र काम करू – राहुल

निवडणुकीत विरोधकांच्या पाठिंब्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर राहुल म्हणाले की, मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आभार मानतो. आगामी काळात सर्व मिळून काम करू. त्यांनी मला कायमचे अपात्र ठरवावे, पण मी माझे काम करत राहीन, असे राहुल म्हणाले.

वायनाडच्या लोकांना पत्र लिहिणार – राहुल

आता वायनाडमधून कोण निवडणूक लढवणार? या प्रश्नाच्या उत्तरात राहुल गांधी म्हणाले की, ते काँग्रेस अध्यक्ष ठरवतील. वायनाडच्या लोकांनाही पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. ओबीसी समाजाचा अपमान केल्याच्या भाजप नेत्यांच्या आरोपावर राहुल गांधी म्हणाले की, मी नेहमीच बंधुभावाबद्दल बोललो.

 

Previous Post

बनावट नोटा प्रकरणी दोघांना अटक; १ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

यावल तालुक्यातील वृध्दाच्या खून प्रकरणाला वेगळे वळण; पोलिसांनी केली सुनेला अटक

Next Post
जामनेर तालुका हादरला! घरात महिला एकटी असल्याचे पाहून केली निर्घृण हत्या

यावल तालुक्यातील वृध्दाच्या खून प्रकरणाला वेगळे वळण; पोलिसांनी केली सुनेला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!