जळगाव : कामावरून घरी जाताना भरधाव ट्रकच्या धडकेत फायनान्स कंपनीचा कर्मचारी ठार झाला. ही घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळ हॉटेल गिरणाई समोर घडला. अक्षय भेंडे (वय 32, वर्धा, ह.मु. रामानंद, जळगाव), असे मयत तरुणाचे नाव आहे.
शहरातील एका फायनान्स कंपनीत कामाला असणारे 10-12 मित्रांचा एक ग्रुपने बांभोरी पुलाजवळ हॉटेल गिरणाईमध्ये पार्टीसाठी आला होता. अक्षय भेंडे याने सुरुवातीला पार्टीला येण्यास नकार दिला परंतू नंतर एका मित्राच्या आग्रहाखातर तो पार्टीला सर्वात उशिरा पोहोचला. जेवण आटोपल्यानंतर हॉटेलमधून आपली दुचाकी क्र.(एम.एच.49 ए.टी.4407) बाहेर पडले. हायवेवर लागत असतांना बाराचाकी ट्रक क्र. (एम.एच.32 आर.4072) हा बांभोरीकडून येत असताना अक्षय रस्त्यावर गाडी घेत असतानाच ट्रकने चिरडल्याने अक्षयचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भयंकर होता की, मृतदेहाचा छातीवरील भागचा अक्षरश: चेंदामेंदा झालेला होता.
घटनास्थळी पोलिसांची धाव
अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस स्थानकातील कर्मचार्यांनी मृतदेहला जिल्हा रुग्णालयात हलवला. आणि वाहतूक सुरळीत करत ट्रक चालकाला ताब्यात घेतले. दरम्यान, मयत अक्षयच्या मित्रांचा आक्रोश मन हेलावून सोडणारा होता. मयत अक्षयच्या पश्चात पत्नी आणि चार वर्षांची मुलगी आहे.