• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य शासनाचा मोठा निर्णय; तलाठी कार्यालयातील कोतवालांच्या मानधनात दुपटीने वाढ

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 6, 2023
in Uncategorized
0
राज्य शासनाचा मोठा निर्णय; तलाठी कार्यालयातील कोतवालांच्या मानधनात दुपटीने वाढ
Spread the love

मुंबई : राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. राज्यातील कोतवालांचे मानधन आता 7 हजार 500 वरून 15 हजार होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.

राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी राज्याचा सन 2023-24 अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती. अर्थसंकल्पीय भाषणाच्यावेळी केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीच्या सादर केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने दिनांक 17 मार्च, 2023 च्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. शासन मान्यतेनुसार सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना मिळत असलेले मानधन 7 हजार 500 रुपयावरून 15 हजार करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व 12,793 कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट 15 हजार इतके मानधन लागू करण्यात आले आहे. हे मानधन 1 एप्रिल 2023 पासून अनुज्ञेय असणार आहे.

महसूल विभागातील महत्वाचा घटक

राज्याच्या महसूल विभागातील महत्त्वाचा घटक म्हणून कोतवालांकडे पाहिले जाते. गावातील प्रत्येक घरांची अचूक माहिती असल्यामुळे त्यांना गावातील महसूल गोळा करणे व टपाल वाटप करणे सोयीचे जाते. चौथी उत्तीर्ण ही या पदाची पात्रता असून तुटपुंज्या पगारावर काम करीत असताना सुद्धा प्रामाणिकपणे काम करणारे महसूल विभागातील एकमेव पद म्हणजे ‘कोतवाल’ असे म्हणता येईल. कारण अपुऱ्या मानधनावर काम करणारी व्यक्ती असली तरी शासकीय कामकाजामध्ये सरकारी साक्षीदार म्हणून फार मोठी भूमिका बजावत असतात.

Previous Post

सातबारा उताऱ्यावर वारस नोंदीसाठी घेतली लाच; तलाठी अन् कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

Next Post

कोरोनानंतर देशात झपाट्याने वाढताय ‘हे’ आजार, जाणून घ्या कारण आणि उपाययोजना

Next Post
राज्यात कोरोनाने पुन्हा घेतला वेग ; २४ तासांत दुप्पट रुग्ण , कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण ?

कोरोनानंतर देशात झपाट्याने वाढताय 'हे' आजार, जाणून घ्या कारण आणि उपाययोजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!