• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे मंत्रिपदासाठी पैसे घ्यायचे: शिवसेना मंत्र्याचा गंभीर आरोप

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 8, 2023
in Uncategorized
0
उद्धव ठाकरे मंत्रिपदासाठी पैसे घ्यायचे: शिवसेना मंत्र्याचा गंभीर आरोप
Spread the love

लखनऊ : राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडली. यामुळे सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर नेहमी खोके घेतल्याचा आरोप केला जातो. आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. मंत्र्यांकडून त्यांनी किती पैसे घेतले, जे पैसे देऊ शकले नाहीत त्यांना मंत्रीपदावरुन कसे काढले हे सर्व मला माहितीय, अशा शब्दात मंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली आहे.

शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंकडे एक टीम आहे जी त्यांना खोटं कसं बोलायचे ते शिकवते. मुंबईचा पैसा कुणी लुटला हे जनतेला माहिती आहे. किती मंत्र्यांकडून किती पैसे मागितले, जे पैसे देऊ शकले नाहीत त्यांना मंत्रिपदावरून कसे काढले हेसुद्धा मला माहिती आहे. खोकेबहाद्दारांनी असे बोलणे चुकीचे आहे. शेवटी नैतिकता असते. जेव्हा नैतिकता सोडली जाते तेव्हा लोकांच्या संयमांचा बांधही तुटतो. तो आणि तुटायला देऊ नये. ठाकरेंच्या अनेक गोष्टी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाहीत असेही मंत्री केसरकर म्हणाले.

संजय राऊत राष्ट्रवादीशी प्रामाणिक

सत्ता त्यांच्या डोक्यात गेली होती. सत्तेचा माज असल्याने ज्येष्ठ मंत्री, आमदारांनाही ते वेळ देत नव्हते. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात कुठे आहेत हे कुणालाही माहिती नसायचे. बंगल्यात बसायचं आणि राज्य करायचं या कॅटेगिरीतील आदित्य ठाकरे आहेत. तसेच सत्ता गेल्यानंतर जो थयथयाट सुरू आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. लोकांची मने दुखावण्यात पाप असते. ते संजय राऊत रोज करतात. ते ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक नाहीत तर शरद पवारांची प्रामाणिक आहेत. राष्ट्रवादीसाठी काम करतात. शिवसेना फोडायचे जे काम राऊतांना राष्ट्रवादीने दिले ते त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे समाधान झाले असेल तर त्यांनी शांत राहणे आवश्यक आहे असा टोला केसरकरांनी राऊतांना लगावला.

Previous Post

धक्कादायक! बीपीचे औषध समजून घेतले उंदीर मारण्याचे विष; महिलेनं गमावला जीव

Next Post

रावेर टोलनाक्यावर शेतकऱ्यांकडून वसुली; आ. चंद्रकांत पाटील, अनिल चौधरींची धडक

Next Post
रावेर टोलनाक्यावर शेतकऱ्यांकडून वसुली; आ. चंद्रकांत पाटील, अनिल चौधरींची धडक

रावेर टोलनाक्यावर शेतकऱ्यांकडून वसुली; आ. चंद्रकांत पाटील, अनिल चौधरींची धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!