• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाबरीवरुन राजकारण तापले; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल, राजीनाम्याची केली मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 11, 2023
in Uncategorized
0
बाबरीवरुन राजकारण तापले; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल, राजीनाम्याची केली मागणी
Spread the love

मुंबई : राज्याच्या राजकारणात बाबरी मशीद प्रकरणाचा मुद्दा तापू लागला आहे. बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून ठाकरे गटाने शिंदेंच्या शिवसेनाला घेरलं असून, उद्धव ठाकरेंनी हल्ला चढविला आहे. उध्दव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला पाहिजे, नाही तर मुख्यमंत्र्यांनी स्वत: राजीनामा दिला पाहिजे, अशी भूमिका मांडली.

भाजपचे तळवे किती दिवस चाटणार?

लपलेले उंदीर आता बाहेर आले आहेत. बाबरी पाडली तेव्हा सर्व उंदीर लपलेले होते. बाबरी पाडली तेव्हा बरेच उंदीर पळाले असे म्हणत, बाबरी शिवसैनिकांनीच पाडल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला. भाजपकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. आता हे मिंधे काय करणार आहेत. भाजपचे तळवे किती दिवस चाटणार आहात. आता स्वत:चे थोबाड कोणत्या जोड्याने फोडून घेणार आहात? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

चंद्रकांत पाटील म्हणाले, बाबरीचा ढाचा पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते? शिवसेना तिथे गेली होती? की बजरंग दल तिथे होतं? कारसेवक कोण होते? कारसेवक हे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असं म्हणत नव्हते की आम्ही बजरंग दलाचं नाव घेणार नाही. ज्यांनी बाबरी पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते, असं चंद्रकांत पाटील यांनी मुलाखतीत म्हटलं होतं.

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी; पोलिसांनी आरोपीला केली अटक, म्हणूनच केला कॉल

Next Post

यंदाचा मान्सून कसा असेल? हवामान विभागाने जारी केला पहिला अंदाज

Next Post
राज्यभरात अवकाळी पावसाची हजेरी: ‘या’ 13 जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट, गारपिटीचा इशारा

यंदाचा मान्सून कसा असेल? हवामान विभागाने जारी केला पहिला अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!