• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात नेमकं काय घडलं? कशामुळे झाला 11 जणांचा मृत्यू, 600 जणांना उष्माघात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 17, 2023
in Uncategorized
0
महाराष्ट्र भूषण सोहळ्यात नेमकं काय घडलं? कशामुळे झाला 11 जणांचा मृत्यू, 600 जणांना उष्माघात
Spread the love

मुंबई: ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या कार्यक्रमादरम्यान तब्बल 600 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत केली जाणार आहे. तर उपचारधीन असलेल्यांचा खर्च सरकार करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा कार्यक्रम नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि राज्यातील अनेक कॅबिनेट मंत्र्यांसह सुमारे 3 लाख लोक उपस्थित होते. या कार्यक्रमात अमित शहा यांनी समाजसेवक दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांना पुरस्काराने सन्मानित केले.

सरकारवर होतेय टीका

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या कार्यक्रमादरम्यान तब्बल 600 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये आठ महिला असून बहुतांश वृद्ध आहेत. हृदयविकाराच्या समस्या आणि रक्तातील साखरेच्या पातळीतील चढउतार यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी काही रुग्ण गंभीर आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या सोहळ्याच्या नियोजनातील अक्षम्य त्रुटी आणि ढिसाळ कारभाराच्या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात आहे.

इतक्या लोकांचे मृत्यू कसे झाले?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला राज्यभरातून तब्बल 25 लाख भाविक जमले होते. मात्र, येथील नियोजन अत्यंत ढिसाळ होते. हा कार्यक्रम दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहिला. त्यामुळे सामान्य अनुयायांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. पाण्याचे टँकर्स मैदानापासून दूर ठेवण्यात आले होते. बरेच अनुयायी शनिवारी रात्रीच नवी मुंबईत दाखल झाले होते. कार्यक्रम संपेपर्यंत हे अनुयायी उपाशीच राहिले. अशातच बराच काळ पाणी न मिळाल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले. परिणामी उष्माघाताचा परिणाम जास्त झाला. कार्यक्रम संपताच 25 लाखांची गर्दी एकत्र मैदानाबाहेर पडली. त्यामुळे उष्माघातामुळे बेशुद्ध पडलेल्या अनुयायांना रुग्णालयात घेऊन चाललेल्या रुग्णवाहिकांचा रस्ता अडला. परिणामी अनुयायांना वेळेत उपचार मिळण्यात अडचण आली. या सगळ्यामुळे 11 लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती आहे.

Previous Post

चाळीसगाव तालुक्यात कामगारांना मिळणार मोफत भोजन; आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने कामगार विभागाचा उपक्रम

Next Post

भारतीय सॉफ्टबॉल संघाच्या सरावास सुरवात; विद्यापीठाचा उपक्रम

Next Post
भारतीय सॉफ्टबॉल संघाच्या सरावास सुरवात; विद्यापीठाचा उपक्रम

भारतीय सॉफ्टबॉल संघाच्या सरावास सुरवात; विद्यापीठाचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!