• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जयंत पाटलांच्या दाव्यानं खळबळ; महाविकास आघाडीत उभा राहणार संघर्ष?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 30, 2023
in Uncategorized
0
राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार: जयंत पाटलांचा खळबळजनक दावा
Spread the love

मुंबई: राज्यात राजकिय हालचाली गतिमान झाल्या आहेत. मुख्यमंत्री पदावरुन दावे-प्रतिदावे केले जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

राज्यातील राजकारण अस्थिर झाले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पायउतार व्हावे लागल्यास पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन चर्चा सुरु झाली आहे. यात विरोधी पक्षनेते अजित पवारांचे नाव चांगलेच चर्चेत आले. राज्यात काही ठिकाणी अजित पवार हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे बॅनर झळकले होते. त्यावरून देखील चर्चा सुरू असतांना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री पदावरून महत्वाचे वक्तव्य केले आहे.

राष्ट्रवादीला जनतेचा मोठा पाठिंबा

जयंत पाटील म्हणाले की, “सध्या महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. समाधान याचं आहे की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार आहे, हे आता सगळ्यांनी मान्य केलं आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल,” असं मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं आहे.

अजितदादा आणि माझ्यात स्पर्धा नाही

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं विधान केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील, असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं होतं. यावर जयंत पाटील म्हणाले, जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत याची चर्चा करण्यात अर्थ नाही. अजितदादा आणि माझ्यात कोणाशीही स्पर्धा नाही. पोस्टरबाजी आणि मागणी ही कार्यकर्त्यांच्या भावना आणि अमोल कोल्हे यांचे केवळ मत इथंपर्यंतच या गोष्टी मर्यादित आहेत.

Previous Post

जंगलात सरपण गोळा करण्यास गेला; अन् दबा धरलेल्या बिबट्यानं केला हल्ला

Next Post

130 वर्षांनंतर बुद्ध पौर्णिमेला विशेष योग! देशभरात दिसणार या वर्षातील पहिले चंद्रग्रहण

Next Post
130 वर्षांनंतर बुद्ध पौर्णिमेला विशेष योग! देशभरात दिसणार या वर्षातील पहिले चंद्रग्रहण

130 वर्षांनंतर बुद्ध पौर्णिमेला विशेष योग! देशभरात दिसणार या वर्षातील पहिले चंद्रग्रहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!