• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळात वाढत्या तापमानाने घेतला बळी; रेल्वे कर्मचाऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 16, 2023
in Uncategorized
0
भुसावळात वाढत्या तापमानाने घेतला बळी; रेल्वे कर्मचाऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू
Spread the love

भुसावळ: भुसावळ शहरात तापमानाचा पारा ४७ अंशावर गेला आहे. त्यामुळे उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भुसावळ शहरात रेल्वे कर्मचाऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

भुसावळ शहरातील रेल्वे कर्मचारी गिरीश शालिग्राम पाटील (वय २८) यांना आज सकाळी उलट्या होऊ लागल्याने व पोटात दुखत असल्याने डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी औषधी देऊन त्याला घरी पाठवले, मात्र उलट्या न थांबल्यामुळे डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दुपारी २ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. मानवतकर यांनी बाजारपेठ पोलिसात माहिती दिली आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गिरीश हा शालिक मिठाराम पाटील यांचा लहान मुलगा आहे.

उष्माघातापासून सुरक्षेसाठी अशी घ्या काळजी

* तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या.
* सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा.
* बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
* प्रवास करताना सोबत पाण्याची बॉटल घ्यायला विसरू नका.
* आपलं घरं थंड ठेवा, पडदे लावा, सनशेड बसवा आणि शक्य असल्यास रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
* उन्हात डोक्यावर छत्री, टोपीचा वापर करा. डोके, गळा, चेहºयासाठी ओल्या कपड्याचा वापर करा.
* अशक्तपणा, कमजोरपणा जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
* ओआरएस, घरातील लस्सी, तोरणी, लिंबू पाणी किंवा ताक इत्यादी प्या.
* थंड पाण्याने आंघोळ करा.
* दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान उन्हात फिरू नका.
* मद्यसेवन, चहा, कॉफी आणि काबोर्नेटेड सॉफ ड्रिंक्स पिणं टाळा, त्यामुळे डिहायड्रेशन होतं.
* उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळं अन्न खाऊ नका.

Previous Post

मोदी सरकारची ‘स्वस्त सोने’ योजना सुपरहिट, 5 वर्षात पैसा झाला डबल

Next Post

धरणगाव हादरले! पती-पत्नीचा वाद सोडवण्यास गेला, जीव गमावून बसला

Next Post
खळबळजनक! शेतात आढळले मानवी कवटी व हाडे

धरणगाव हादरले! पती-पत्नीचा वाद सोडवण्यास गेला, जीव गमावून बसला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!