• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…तर भविष्यात ‘द जळगाव स्टोरी’; बेपत्ता मुलींबाबत मुस्लिम शिष्टमंडळाची मोठी मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 17, 2023
in Uncategorized
0
…तर भविष्यात ‘द जळगाव स्टोरी’; बेपत्ता मुलींबाबत मुस्लिम शिष्टमंडळाची मोठी मागणी
Spread the love

जळगाव: महाराष्ट्र राज्य विधानसभा अधिवेशन मधील महिला व बालकल्याण विकास मंत्री यांचे राजकीय वक्तव्य, नुकताच प्रदर्शित झालेला द केरला स्टोरी व नुकतीच प्रसिध्द झालेली बेपत्ता मुलींची अधिकृत माहिती हे वाचून अत्यंत वेदना झालेल्या आहेत. राज्यात जानेवारी २०२३ मध्ये १६००,फेब्रुवारीमध्ये १८१० व मार्चमध्ये २२०० अशा प्रकारे मुली बेपत्ता झाल्या आहेत. तीन महिन्यात ५६१० मुली बेपत्या झाल्या असून त्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी सदर प्रकरणी त्वरित दखल घेऊन तपास करावा व वस्तूस्थिती माहिती सादर करावी, अशी मागणी मुस्लिम शिष्टमंडळाने केली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनान निवेदन देण्यात आले.

जळगाव जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील बेपत्ता मुलींचा वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. मार्च २०२३ मध्ये ज्या २२०० मुली बेपत्ता आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील ८१ मुलींचा सहभाग आहे. या ८१ मुलीमध्ये १८ वर्षावरील मुलींचा व महिलांचा समावेश आहे. १८ वर्षाखालील मुलींची संख्या यात नमूद केलेले नाही. सरासरी विचार केला तर एका महिन्यात ८१ मुली बेपत्ता होतात तर एका वर्षात सुमारे १००० मुली बेपत्ता होत असाव्यात.

‘द महाराष्ट्र स्टोरी’ भविष्यात…

शिष्टमंडळाने ५ पानी निवेदनात मुख्यमंत्री, गृहमंत्री, महिला व बाल विकास मंत्री, राज्य महिला आयोग, पालकमंत्री जळगाव जिल्हा, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी जळगाव व पोलीस अधीक्षक जळगाव यांना निवेदनाद्वारे हीच मागणी केली आहे की “महाराष्ट्र राज्यातील ३ महिन्याची सरासरी ५६१० मुली आहे. तर त्या वर्षाला २२००० च्या वर जाते व कोणी चित्रपट निर्मात्याने चित्रपट तयार करण्याचा विचार करून १० वर्षानंतर चित्रपट तयार केला. तर त्यात तो २२२००० मुली महाराष्ट्रातून बेपत्ता झाल्याची माहिती सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न करेल. एवढेच नव्हे तर ‘द जळगाव स्टोरी’ हा सिनेमा कोणी तयार करण्याचा प्रयत्न केल्यास एका महिन्यात ८१ मुली जळगावतून बेपत्ता होतात तर एका वर्षात ती संख्या सरासरी ९७० होईल व दहा वर्षानंतर सिनेमा काढल्यास ही संख्या १२ हजाराच्या वर जाईल. अशा प्रकारे मुलींच्या बेपत्ता होण्यास जातीय विखारी स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाईल.

निवेदनाद्वारे मागणी

केरला स्टोरी च्या ट्रेलर मध्ये ३२००० मुलींची संख्या दाखवली आहे. प्रत्यक्षात फक्त ३ मुली असल्याचे चित्रपट निर्म्यात्याने कबुल केले हे जरी खरे असले तरी कोणत्याही दहशतवादाकडे दुर्लक्ष करता कामा नये परंतु विपर्यास्त मांडणी केली जाते, त्यामागे काही पूर्वनियोजित कारस्थान आहे हे देखील लक्षात घेतले पाहिजे. मुलींचा बेपत्ता होण्याचा मुद्दा काळजीचा आहे परंतु त्याकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहिले जाणे आवश्यक आहे. मुलींना गर्भातच मारले जाते, हुंड्यासाठी विवाहितेला जाळले जाते, यावर भाष्य करायचे नाही. परंतु धार्मिक विखार निर्माण करून सिनेमा मोफत दाखवायचा म्हणजे चर्चा वेगळ्या दिशेने न्यायची हे त्यावरील उत्तर नाही. हा प्रश्न गंभीर आहे परंतु त्याचे अचूक निदान झाल्या खेरीज आपल्याला उपचार सापडणार नाही. म्हणून शासनाने बेपत्ता झालेल्या मुलींचा तपास करून वस्तुस्थिती अहवाल जनतेसमोर आणावा अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी व आमदार यांना निवेदन

शिष्टमंडळाने निवासी उप जिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. तर शिष्टमंडळाचे निमंत्रक फारूक शेख यांनी आमदार सुरेश भोळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदनावर जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस बाबा देशमुख, राष्ट्रवादीचे सलीम इनामदार, हुसेनी सेना चे अध्यक्ष फिरोज शेख, मनसेचे अध्यक्ष जमील देशपांडे, ए यु सिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल, सिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous Post

सातबारा उताऱ्यावर पीककर्जाचा बोजा लावण्यासाठी घेतली लाच, पाचोऱ्यात एकास अटक

Next Post

जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ, राजकीय वर्तुळात खळबळ

Next Post
जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ, राजकीय वर्तुळात खळबळ

जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ, राजकीय वर्तुळात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!