• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल; भाजप कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 18, 2023
in Uncategorized
0
शरद पवारांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल; भाजप कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले..
Spread the love

पुणे : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यामध्ये पार पडली, या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत जोरदार टोलेबाजी केली आहे. शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देतो असं जाहीर केलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. तसंच कर्नाटकच्या निकालावरूनही त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं आहे. आपल्या खास शैलीत त्यांनी शरद पवारांवर टोलेबाजी केली आहे. “टीआरपी कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण आपल्याला घ्यावं लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच राजीनामा मागे घेईन आणि माझ्या जागी परत येईन. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आपल्या कृतीतून सांगितलं की राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय आहे?” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

कर्नाटक पटर्न महाराष्ट्रात चालणार नाही

मतांचं धृवीकरण कितीही करा. कितीही लांगूलचालन करा. कर्नाटक पटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. इथे फक्त मोदींचा पटर्न चालणार. कर्नाटकमध्ये 700 पेक्षा कमी मतांनी पडलेले उमेदवार 5 आहेत आणि 2 ते तीन हजारांनी पडलेले 42 उमेदवार आहेत. राज्यात भाजप आणि सेनेची युती भक्कम आहे. आज फक्त शिल्लक सेना महाविकास आघाडीकडे आहे. येत्या निवडणुकीत महापालिका असो की लोकसभा की विधनासभा या निवडणुका युतीच जिंकणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

उध्दव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरेंनी 8 मागण्या सर्वोच्च न्यायालयात मांडल्या होत्या. मात्र एकही मागणी मान्य झाली नाही. तरी उद्धव ठाकरे म्हणतात जा जा गावी कोर्टचा निर्णय सांगा…, असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला आहे.

Previous Post

अमळनेर तालुक्यात मका पिकाला आग; दीड लाखांचे नुकसान

Next Post

शिवाजी महाराजांची तलवार आणि वाघ नखे परत आणणार; महाराष्ट्राचे मंत्री इंग्लडला जाणार

Next Post
शिवाजी महाराजांची तलवार आणि वाघ नखे परत आणणार; महाराष्ट्राचे मंत्री इंग्लडला जाणार

शिवाजी महाराजांची तलवार आणि वाघ नखे परत आणणार; महाराष्ट्राचे मंत्री इंग्लडला जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!