• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर! यंदा मान्सून तीन दिवस अगोदर धडकला, महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार आगमन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 20, 2023
in Uncategorized
0
राज्यभरात अवकाळी पावसाची हजेरी: ‘या’ 13 जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट, गारपिटीचा इशारा
Spread the love

पुणे : गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभरात तापमानाचा पारा अधिकच वाढला आहे. त्यामुळे उकाडा जाणवत असून, अंगाची लाहीलाही होत आहे. अशा वातावरणात आता लोक पावसाची आतुरतेनं वाट पाहू लागले आहेत. केव्हा पाऊस पडेल अन् उकाड्यातून सुटका होईल अशी सर्वसामान्यांची अवस्था झाली आहे. यासंदर्भात हवामान विभागाने एक दिलासादायक बातमी दिली आहे.

हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात १९ मे रोजी आगमन झाले. पुढील ३-४ दिवसांत नैऋत्य मान्सून, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, अंदमान समुद्र,अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रात सात जूनपर्यंत येणार मान्सून

मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमधील पोहचला आहे. यामुळे यावर्षी मान्सून तीन दिवस उशीरा येणार होता. परंतु आता त्याची चाल अनुकूल राहिली तर केरळमध्ये १ जूनपर्यंत दाखल होईल. हवामान विभागाने केरळमध्ये तीन ते चार जूनपर्यंत मान्सून येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. यामुळे महाराष्ट्रात सात जूनपर्यंत येणार मान्सून मुंबईत यंदा १० किंवा ११ जूनला येणार होता. परंतु आता मान्सून वेळेवर दाखल होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. राज्यात ९६ टक्के पर्यंत सामान्य मान्सून होणार आहे. राज्यात यंदा ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, असा अंदाज आहे. हवामान विभागाकडून मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनचा पुन्हा अपडेट येणार आहे, त्यावेळी अधिक चित्र अधिक स्पष्ट होईल, असेही सुनील कांबळे यांनी सांगितले. महाराष्ट्रात आगमन झाल्यावर पावसाचा पुढील प्रवास कसा असेल याबाबतची सविस्तर माहिती महिना अखेरीस सांगण्यात येणार आहे.

Previous Post

राज्यातील जनता उकाड्यामुळं हैराण, वीजेच्या मागणीत रेकॉर्ड ब्रेक वाढ

Next Post

जळगाव जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा जप्त; जिल्हा पोलिसांची धडक कारवाई

Next Post
जळगाव जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा जप्त; जिल्हा पोलिसांची धडक कारवाई

जळगाव जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा जप्त; जिल्हा पोलिसांची धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!