• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील पोलीस पाटलांना आता १५००० भरघोस मानधन, आमदार मंगेशदादा चव्हाण व पोलीस पाटील संघटनांच्या प्रयत्नांना यश

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांनी शब्द पाळला..

Team Rajmudra by Team Rajmudra
March 13, 2024
in Uncategorized
0
Spread the love

चाळीसगाव (राजमुद्रा):- मुंबई – पोलीस पाटील हे ग्रामीण भागातील जनता व पोलीस प्रशासन यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम करतात. कोविड काळात स्वतःच्या जीवाची परवा न करता गावाच्या रक्षणासाठी त्यांनी काम केलं आहे. मात्र त्यांना मिळणारे ६५०० हे मानधन अतिशय तुटपुंजे असल्याने राज्यातील पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.

यासाठी पोलीस पाटील संघटनांच्या वतीने चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. यासाठी अधिवेशनादरम्यान मोर्चे काढण्यात आले, अनेक शासकीय स्तरावर बैठका घेण्यात आल्या.
अखेर आमदार मंगेशदादा चव्हाण व पोलीस पाटील संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले असून मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पोलीस पाटील यांचे मानधन ६५०० वरून थेट १५००० करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दि.७ मार्च रोजी चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उद्घाटन कार्यक्रमाला नामदार गिरिषभाऊ महाजन आले असता तालुक्यातील पोलीस पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे तुमच्या विषयाबाबत अतिशय सकारात्मक असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याचे आश्वासन दिले होते. अखेर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मानधनवाढीचा निर्णय झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांनी आपला शब्द पाळला आहे. त्याबद्दल सर्व पोलीस पाटील संघटनांच्या वतीने त्यांचे व यासाठी पाठपुरावा करणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

कायदा सुव्यवस्था दृष्टीने महत्वाच्या घटकाला भाजपा महायुती सरकारने न्याय दिला – आमदार मंगेश चव्हाण

पोलीस व गाव यातील दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतात, अनेक कठीण प्रसंगात त्यांची मोलाची मदत प्रशासनाला होत असते मात्र त्यांना मिळणारे अतिशय अल्प मानधन व शासनाकडून कुठल्याही भरीव सुविधा त्यांना मिळत नसल्याने त्यांच्या विविध मागण्यांसाठी माझा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. मागील काळात देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना सन २०१९ मध्ये पोलीस पाटील यांचे मानधन ३००० वरून दुप्पट ६५०० करण्यात आले होते मात्र नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने कुठल्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत ही वस्तुस्थिती होती, त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस हेच पोलीस पाटील वर्गाला न्याय देऊ शकतात याचा मला विश्वास होता. आज अखेर भरघोस अशी मानधनवाढ करण्याचा मंत्री मंडळ बैठकीत निर्णय झाल्याने ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या एका जबाबदार घटकाला भाजपा महायुती सरकारने न्याय दिला अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

Previous Post

जळगांव जिल्हापेठ पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी, मोबाईल स्नचिंग प्रकरणातील आरोपी 24 तासात मुद्देमालासह गजाआड

Next Post

भाजपची यादी जाहीर होताच हा आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर

Next Post

भाजपची यादी जाहीर होताच हा आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!