• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मतदान करा“ 55 हजार विद्यार्थ्यांचे आई-बाबांना पत्र*

Team Rajmudra by Team Rajmudra
April 3, 2024
in Uncategorized
0
Spread the love

चाळीसगाव (राजमुद्रा ) : –  लोकसभेसाठी मतोत्सवाची घोषणा नुकतीच देशभरात झाली आहे .जळगाव जिल्ह्यातील मतदान चौथा टप्प्यामध्ये होणार आहे .चाळीसगाव मतदारसंघातही निवडणुक पूर्वतयारीच्या कामांना वेग आला आहे .मतदान कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे ,त्यांना प्रशिक्षण देणे ,आचारसंहिता कक्षाची स्थापना ,मतदान केंद्रांची व्यवस्था त्याचबरोबर मतदार संघातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रोत्साहन पर प्रयत्न होत आहेत. मा. आयुष प्रसाद,जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी नुकतीच चाळीसगाव मतदारसंघांमध्ये भेट घेऊन निवडणूक पूर्वतयारी कामाचा आढावा घेतला .निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून प्रमोद हिले प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी ,तसेच प्रशांत पाटील ,तहसीलदार तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी, विलास भोई गटशिक्षण अधिकारी तथा नोडल अधिकारी ,जगदीश भरकर अप्पर तहसीलदार,संदेश निकुंभ, निवडणूक नायब तहसीलदार यांनी मतदारांना आवाहन करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भावनिक साद घातली .शाळेतील चिमुरड्यांनी आपल्या घरातील आई-वडील आजी बाबा सज्ञान ताई, दादा यांना पत्र लिहून मतदान करण्याचे आवाहन करण्याचे निश्चित झाले.

चाळीसगाव मतदारसंघातील लोकशाहीच्या महासंग्रामात 341 मतदान केंद्रावर दिनांक 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे यामध्ये तीन लाख 58 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत .2019 मधील लोकसभा निवडणुकीत 58.20% मतदान झाले होते ,मतदानाचा हा टक्का वाढविण्यासाठी लहान बालकांनी आपल्या घरातील मतदारांना जागृत करण्यासाठी हा विशेष प्रयत्न केला आहे . चाळीसगाव तालुक्यातील 342 शाळा 55 हजार विद्यार्थी सामूहिक पत्र लिहिण्याची मोहीम 2 एप्रिल 2024 रोजी *फत्ते* केली . विशेष म्हणजे प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी केलेल्या केवळ एका व्हाट्सअप मेसेजला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील सुमारे अकराशे शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतल्याने एकाच दिवशी पंचावन्न हजार पत्रे पालकांपर्यंत पोहोचली .या पत्राची पोहच शाळेमध्ये संकलित करण्यात येणार आहे. या पत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांना आपला देश हा प्रगल्भ लोकशाहीची ख्याती असलेला खंडप्राय देश आहे.आपल्या देशाचे सरकार निवडण्याचा अधिकार हा मतदारांचा आहे.लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान केलेच पाहिजे . आई,बाबा, आपणांसह सर्वांनी मतदान केले तरच आमचे भविष्य उज्वल राहील अशी भावनिक साथ घातली आहे .

“या मुलांच्या भावनिक आवाहनामुळे निश्चितपणे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल” असा विश्वास सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रमोद हिले यांनी व्यक्त केला आहे.

मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चाळीसगाव तालुक्यामध्ये दौऱ्याच्या दरम्यान मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने “विद्यार्थ्यांचे पालकांना पत्र” ही प्रांताधिकारी व तहसीलदार यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.

सर्व शिक्षकांनी यात मोलाची मदत केली

Previous Post

लोकसभेसाठी काँग्रेसची आणखी एक यादी जाहीर; 17 जणांमध्ये ‘यांचा’ समावेश

Next Post

सर्वात मोठी बातमी, शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांची उमेदारी रद्द, नवा उमेदवार घोषित

Next Post

सर्वात मोठी बातमी, शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांची उमेदारी रद्द, नवा उमेदवार घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!