• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘तुम्हाला माझ्या मायची शपथ सांगतो…’, बच्चू कडू यांचं कार्यकर्त्यांना कळकळीचं आवाहन

Team Rajmudra by Team Rajmudra
April 3, 2024
in Uncategorized
0
Spread the love

 अमरावती (राजमुद्रा) : –     आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार दिनेश बुब यांनी आज अमरावती मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर प्रहार पक्षाकडून अमरावती भव्य रॅली काढण्यात आली. यानंतर सभेचं आयोजन केलं. या सभेत बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती देखील केली. “कार्यकर्ते स्वत:चे पैसे खर्च करुन इथे आले, हीच तर प्रहारची ताकद आहे. पण आता झोपू नका. जपून राहा. आता झोप उडवायचे दिवस आहेत. 20 दिवस… आता नाही तर कधी नाही. आता हार घेतली तर पुन्हा पैसेवाल्याची जीत होणार. पुन्हा नेतेवाल्यांची जीत होणार. सामान्य माणसं धुळीत टाकणार. पुन्हा लोकशाही पैशांच्या समोर झुकून टाकणार”, असं बच्चू कडू म्हणाले.

“तुम्हाला माझ्या मायची शपथ सांगतो, रोज पाच-सहा गाव फिरले पाहिजेत. खिशातले पाचशे ते हजार रुपये खर्च केल्याशिवाय भाऊ ही निवडणूक जिंकू शकत नाही. समोर 500 कोटीचा मालक आहे, त्याच्यासमोर आम्हाला लढायचं आहे. हे पक्ष त्यांच्या पंगतीत बसलेले आहेत. ती पंगत मला तोडायची आहे. त्यासाठी तुम्ही थोडी हयगय केली, फोन केला आणि बच्चू भाऊ गाडी पाठवू का? सांगा, ही दिलदारी दाखवावी लागेल. अमरावतीकरांसाठी 26 दिवस, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, जात काय असेल ते माहिती नाही. एकच लक्ष्य ठेवलं पाहिजे की, तुमचा आमचा स्वाभिमान”, असं बच्चू कडू कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

‘ही आग आम्ही बुजवणार नाहीत’

“अण्णा भाऊ साठेंनी शाहिरीतून हिंदुस्तान उभा करण्याचं काम केलं. महात्मा जोतिबांनी शेतकऱ्यांच्या आसूड पुस्तक लिहून त्यावेळच्या सरकारवर शेतकऱ्याबाबत घणघणात केला. ही ज्वाला गावागावापर्यंत नेण्याचं काम करावं लागेल. दऱ्याखोऱ्यातला एक-एक आदिवासी बाहेर काढून मतदान टाकल्याशिवाय ही आग आम्ही बुजवणार नाहीत. आम्ही आगीत उडी टाकली आहे. आम्ही हिंमतीने समोर आलो आहोत. आम्हाला उद्या कदाचित जेलची पायरी चढावी लागेल, अशी अवस्था आहे. तरीसुद्धा डर नाही, डरानेवाले को हम डराते हैं”, असं बच्चू कडू म्हणाले.

‘एक-एक माणसं कव्हर करा’

“आम्ही अचलपूरमध्ये सुद्धा मागे पडू देणार नाहीत. 15 ते 20 हजाराचं लीड घेतल्याशिवाय थांबायचं नाही. सकाळी पाच वाजता उठायचं, रात्री बारा-एक वाजेपर्यंत लढत राहायचं. एक-एक माणसं कव्हर करा. असं नाही की, बडा नेता आहे म्हणून मत मिळतं. सामान्य माणूस उभा राहतो तर नेताला झुकवून टाकतो. सगळ्या नेत्यांच्या सभा होतील. पण माझा कार्यकर्ता मतदारापर्यंत पोहोचला तर लढाई सोपी आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.

‘अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचंय’

“लोकसभा फक्त 5 हजार मतांनी पडलो होतो. ते स्वप्न पूर्ण करायचं आहे. मला माहिती आहे दिनेश भाऊ ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. आपलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तटस्थची भूमिका घेता आली असती आणि मस्त झोपून मस्त आराम करता आला असता. पण सगळ्यांनी स्वाभिमान विकला तर उभा कोण राहिल. टक्कर कोण देणार? ही लढाई फक्त बच्चू कडूची नाही तर तुमची-आमची सर्वांची आहे. चालाल तर आयुष्यभर चालत राहाल”, असंही बच्चू कडू यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

Previous Post

भावना गवळी यांचा पत्ता कट, यवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांना उमेदवारी?

Next Post

ठाकरे पिता-पुत्र तुरुंगात जातील, माझ्याकडे सीबीआय, ईडीसारख्या यंत्रणा; नारायण राणे यांची आतषबाजी

Next Post

ठाकरे पिता-पुत्र तुरुंगात जातील, माझ्याकडे सीबीआय, ईडीसारख्या यंत्रणा; नारायण राणे यांची आतषबाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!