• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात राष्ट्र्पती राजवट लागू होणार ; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने खळबळ

Team Rajmudra by Team Rajmudra
August 31, 2024
in राजकीय
0
राज्यात राष्ट्र्पती राजवट लागू होणार ; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने खळबळ
Spread the love

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना महाराष्ट्रात सध्याची परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे . या पार्शवभूमीवरच आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवर शंका आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .

दरम्यान आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून विविध पक्षाचे राजकीय नेते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांची पाहणी करत मतदारसंघांची चाचपणी करत आहेत. तर काही पक्षात नेत्यांचे इनकमिंग आऊटगोईंग होण्यास सुरुवात झाली आहे . आता या निवडणुकांआधीच राज्यात राष्ट्र्पती राजवट लागू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे . महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लोकसभेप्रमाणे विधानसभेचा सामना रंगणार आहे . यासाठी जागावाटपाचा तिढा सुरु असतानाच आता केंद्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाविकासआघाडीला जवळपास 180 च्या आसपास जागा मिळतील. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची. यानंतर काही काळ गेल्यानंतर तसेच वातावरण शांत झाल्यानंतर निवडणुकांना सामोरे जायचे, अशा हालचाली सध्या सुरु असल्याची माहिती काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे . मात्र दुसरीकडे विधानसभा निवडणुकांची तारीखही अद्याप जाहीर झालेली नाही .

तर दुसरीकडे महायुतीमध्ये काही सुरळीत नसल्याचे दिसून येत आहे .महायुतीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष आहेत. परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत झालेली युती शिवसेना अन् भाजपच्या कार्यकर्त्यांना पटलेली नाही. त्यामुळॆ ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत जागावाटपावरून ठिणगी पडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

 

Tags: #vidhansabha electionMaharastra governmentprithaviraj chavan
Previous Post

अजितदादांची राष्ट्रवादी विधानसभेला ६० जागांवर निवडणूक लढवणार

Next Post

अनिल देशमुखांच्या बालेकिल्यात अजितदादांची तोफ कडाडली

Next Post
अजितदादांची राष्ट्रवादी विधानसभेला ६० जागांवर निवडणूक लढवणार

अनिल देशमुखांच्या बालेकिल्यात अजितदादांची तोफ कडाडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!