• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोविड कंत्राटी कामगारांना वाऱ्यावर सोडू नका अन्यथा – खा. उन्मेष पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 4, 2021
in राजकीय
0
Spread the love

चाळीसगाव राजमुद्रा वृत्तसेवा | कोविड १९ या महामारीत गेल्या वर्षभरापासून ते आजपर्यंत सातत्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णांना रात्र दिवस सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. असे असताना जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव तसेच जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या आदेशानुसार त्यांना कर्तव्यावरून कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र हा प्रकार म्हणजे “गरज सरो वैद्य मरो” याप्रमाणे वापरून फेकून देण्यासारखा आहे.

ज्या कर्मचाऱ्यांनी गेले वर्षभर कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत रात्रंदिवस काम केले अशा कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून देणे माणुसकीला धरून नाही हे कर्मचारी गेल्या वर्षभरात कुशल झाले असल्याने त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे त्यांना आरोग्य विभागाच्या इतर योजनांमध्ये समावेश करून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अन्यथा या कर्मचाऱ्यांसोबत मलाही रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य कोविड हंगामी, रोजंदारी कर्मचारी अर्थात हे सर्व कोरोना योद्धे यांना अचानक कामावरून कमी करण्याचे आदेश दिल्याने हे सर्व 45 कर्मचारी आज खासदार उन्मेशदादा पाटील यांच्याकडे आपली समस्या मांडण्यासाठी खासदार जनसंपर्क कार्यालयात उपस्थित झाले होते. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी खासदार उन्मेशदादा पाटील यांना दिले. यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव, मा. डॉ. अर्चना पाटील आरोग्य संचालक यांना दूरध्वनीवर संपर्क करून या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे मांडले. खासदार पुढे म्हणाले की नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियान तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक यांनी या कंत्राटी कामगारांचा सारासार विचार करत यांना वेगवेगळे योजनेमध्ये समावून घेण्यात संदर्भामध्ये आदेश दिला असताना जळगाव जिल्ह्यात मात्र या कर्मचाऱ्याना कार्यमुक्त करुन अन्याय केला जात आहे. जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी यांच्यावर या आदेशाने बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

वास्तविक पाहता हे कर्मचारी वेगवेगळ्या स्वरूपाची कामे करून गेल्या बारा चौदा महिन्यात कुशल कर्मचारी झाली आहेत. रात्रंदिवस सेवा करणारे कर्मचारी यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या मानवी अधिकाराचे संरक्षण करत त्यांना वेगवेगळ्या आयुष्यमान भारत मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तसेच आरोग्य इतर विभागात समावेश करून घ्यावा अशी विनंती वजा सूचना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी राज्य सरकारकडे मांडली आहे. यावेळी कंत्राटी कामगारांनी आपले म्हणणे मांडले अनेक महिला कर्मचारी यांना यावेळी रडू कोसळले होते. या कर्मचाऱ्यांनी अतिशय भावनिक होत खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनवणी या कर्मचाऱ्यांनी केली.

यावेळी राहुल पवार, भूषण महाजन, चेतन गुडेकर, मनिषा बागुल, किशोर पाटील, द्वारका लव्हारे, सुवर्णा पवार, मोनिका पाडवी, आम्रपाली म्हसदे, कुंदन माळी, आशाबाई निकम, जयश्री जगदाळे, सोनाली गिरासे, सुनिता कोळी, पूनम जाधव, सुवर्णा मोरे, उज्वला मोरे, योगेश्वरी ठोसरे, ज्योती दळवी, मिताली खेडकर, ललिता पावरा, शमीना इस्माईल, प्रज्ञा लोखंडे, भाग्यश्री जगताप, दीक्षा साळवे, नूतन साळवे, शुभम पाटील, धनंजय पाटील, प्रथमेश नवाळे, विनोद भोसले, वैभव पाटील, दीपक पगार, लक्ष्मण माने, निशांत नवाळे,अविनाश राठोड, धनंजय चव्हाण, प्रशांत कोर,सागर धनगर, संदीप पाटील, ईश्वर पिलोरे, सचिन पाटील,सागर पाटील, गोविंद पाटील, तेजस चौधरी यांच्यासह अनेक कर्मचारी बांधव उपस्थित होते.

जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याने हवालदिल झालेल्या कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी सामावून घ्यावे यासाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे , तसेच माननीय आरोग्य मंत्री व संबंधित विभागांकडे पत्राद्वारे या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये यांना आरोग्य विभागाच्या विभागात समावेश करावा अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.

Tags: bhajapchalisgaoncontractcoronacovid 19khasdar unmesh patil
Previous Post

जळगाव लोकसभेसाठी आरोग्यदूत डॉ.भूषण मगर चर्चेत

Next Post

महापालिकेत ५ जुलै रोजी लोकशाही दिन

Next Post

महापालिकेत ५ जुलै रोजी लोकशाही दिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!