जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असल्याने धरणात पाण्याची आवक सुरु झाली आहे. यामुळे धरणातील दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडून विसर्ग केला जात होता. तापी नदीतून विसर्ग कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अल्प पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस नाही. धरणात सध्या तापी पूर्णा नदीतून कमी प्रमाणात आवक होत आहे. तसेच जिल्ह्यात पावसाची आवश्यकता असताना शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.