• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गटनेता बदलण्याच्या हालचाली वेगाने; मात्र शिवसेनेच्या अडचणीत वाढ..!

आता सेनेच्या भूमिकेकडे लक्ष

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 6, 2021
in जळगाव, राजकीय
0
मनपाच्या नगररचना विभागात आला खाऊगिरीला ऊत…

MNP

Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेत सध्या शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांकडून भाजप गटनेता बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्या, तरी त्याला भाजप जिल्हाध्यक्षांनी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवल्याने ब्रेक लागला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या व्हीप नाकारलेल्या तीस बंडखोरांनी गटनेता बदलण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्यानंतर, भाजपकडून त्याला कायदेशीर अडथळे आणण्यास प्रारंभ झाला आहे. भाजप गटनेते भगत बालाणी यांनी महापौर व विभागीय आयुक्तांना पत्र पाठविले आहे. भाजप जिल्हाध्यक्षांच्या परवानगीशिवाय गटनेता बदलण्याची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याने प्रस्ताव आल्यास रद्द करण्याची मागणी केली आहे.

भाजप गटनेत्यांच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली असून, शिवसेनेच्या अडचणीत कायदेशीर रित्या वाढ झाली आहे. महापालिकेतील भाजपाच्या ताब्यातील सत्ता अडीच वर्षात सेनेच्या ताब्यात जाण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या २७ नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. २७ नगरसेवकांशिवाय थेट शिवसेनेत दाखल तीन जणांविरुद्ध लवकरच अपात्रतेचा प्रस्ताव देखील दिला जाणार आहे. भाजपाच्या बंडखोर नगरसेवकांकडून भाजपची सूत्रे ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. गटनेते भगत बालाणी यांच्या जागी ऍड. दिलीप पोकळे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय बंडखोरांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. येत्या महासभेत यासंदर्भात पत्र दिले जाणार आहे. तत्पूर्वी भाजप कडून बंडखोरांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात आला आहे.

भगत बालाणी यांनी दिलेल्या पत्रानुसार भाजपाच्या घटनेत गटनेता बदलण्यासाठी प्रक्रिया निश्चित केली आहे. गटनेता बदलताना भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी गटनेता बदलाचे पत्र दिल्याशिवाय गटनेता बदलता येणार नाही. जिल्हाध्यक्षांनी पत्र न देताच गटनेता बदलल्यास ते बेकायदेशीर व घटनाबाह्य होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा राजकीय ग्रहण लागण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. आणि बंडखोरांना समोर आता नवा पेच निर्माण झाला आहे.

Tags: adv. dilip poklebhagt balanibhajapmahapaurmanapa jalgaonshivsenavibhagiy aayukt
Previous Post

कोरीट खून प्रकरणी आरिपींना कठोर शिक्षेची मागणी

Next Post

स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसेनेत रस्सीखेच सुरू..!

Next Post
स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसेनेत रस्सीखेच सुरू..!

स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसेनेत रस्सीखेच सुरू..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!