राजमुद्रा : महायुती सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योनजेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पाच महिन्यांचे हप्ते जमा झाले आहेत. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशातच नुकतंच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल असून सरकारकडून जनतेला अजूनही आश्वासन दिली जात आहेत… राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसै वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यासलाडक्या बहिणींना आम्ही तीन हजार देणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामिण मतदारसंघातून निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मी मतदानापुरता लोकांशी जोडलेला आहे, असं कोणी कधीच म्हणू शकत नाही. पदावर असो की नसो आयुष्यभर मी जनतेची सेवा करता आलेलो आहे. त्यामुळे मला खात्री आहे विकासाच्या मुद्द्यावर, कार्यकर्त्यांच्या भरोशावर पुन्हा मी निवडून येईल असा मला विश्वास आहे
दरम्यान लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी जोरदार टीका केली.. तसेच सरकारने सुरू केलेल्या या योजनेचे पैसे मिळू नयेत, म्हणून राष्ट्रवादीवाले काँग्रेसवाले कोर्टात गेले आहेत. पण आम्ही ठरवलं आहे सरकारांचा आलं तर बहिणींना मी तीन हजार रुपये देणार आहोत. आमचं सरकार आले नाही तर हे पगार बंद करणार नाही आणि हे बहिणींना माहित आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचा विजय होणार असं गुलाबराव पाटील म्हणालेत.