• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंनी ती जमीन खरेदी केली फक्त ३.७५ कोटींमध्ये

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 8, 2021
in राजकीय
0
खळबळजनक..! या कारणासाठी घेतली होती खडसेंनी अधिकाऱ्यांची बैठक
Spread the love

 

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठीमागे लागलेला ईडीच्या अधिकाऱ्यांचा ससेमिरा वाढत असून, ईडीकडून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत.

मुंबईच्या ईडी कार्यालयाने आज एकनाथ खडसे यांची चौकशी केली. या चौकशीतून अनेक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. दरम्यान ज्या जमिनीचा भूसंपादन मोबदला 200 कोटींपेक्षा जास्त प्रस्तावित होता, ती जमीन एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी जून २०१६ मध्ये फक्त ३.७५ कोटी म्हणजे पावणेचार कोटी मोबदला देऊन खरेदी केली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जमिनीचा मोबदला एवढा कमी देऊन संबंधित जमीन खरेदी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मैदानात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यासंदर्भात जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पद्धतीने खडसे यांना अडकवत असल्याचा आरोप केला आहे. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एकनाथ खडसे यांना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आता पुढे सरसावले आहेत.

भोसरी जमीन खरेदी प्रकरण आणि त्यामध्ये झालेला घोटाळा सध्या मोठ्या प्रमाणात राज्यात गाजत आहे. या प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाल्यानंतर आता ईडी अधिकाऱ्यांची नजर आणखी कोणा कोणावर जाते याकडे राजकीय लक्ष लागून आहे. कारण जमिनीचा शासकीय बाजार भाव आणि भूसंपादन मोबदला दोनशे कोटीपेक्षा जास्त प्रस्तावित असल्याने खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असल्याचे ईडी सूत्रांनी सांगितले.

Tags: edeknath khadsemumbai
Previous Post

खाजगी शाळेतील मनमानी फी थांबेल का? महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचा सवाल

Next Post

आणखी किती फेरीवाल्यांच्या आत्महत्या मनपा प्रशासन पाहणार?

Next Post
आणखी किती फेरीवाल्यांच्या आत्महत्या मनपा प्रशासन पाहणार?

आणखी किती फेरीवाल्यांच्या आत्महत्या मनपा प्रशासन पाहणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!