• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाडक्या बहिणींना टेन्शन : हमीपत्राच्या पडताळणीवर ठरणार योजनेचा लाभ?

Team Rajmudra by Team Rajmudra
December 11, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी ; खानदेशातील “या” जिल्ह्यांचाही समावेश
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीने मोठ्या संख्येने मतदान केल्याने महायुतीचा दणदणीत विजय झाला. गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत पदभार स्वीकारला.. या महायुती सरकारला सत्तेत आणण्यात मोलाचा वाटा ठरलेल्या लाडक्या बहिणींची डोकेदुखी आता वाढणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्ज दाखल करण्यात आले होते..त्या अर्जांची आता पडताळणी सुरू करण्यात आली असून हमीपत्रांच्या पडताळणीवर महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे..त्यामुळे लाडक्या बहिणींचा टेन्शन वाढला आहे..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात असं होतं की, कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, कुटुंबातील सदस्य आयकर भरत नाहीत,, चार चाकी नाही,, पाच एकर पेक्षा जमीन नाही, तसेच शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नाही असं लिहिलं होतं.. या हमी पत्राची आता पडताळणी सुरू झाली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींचा टेन्शन वाढला आहे.. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना जुलै ते नोव्हेंबर चे पैसे खात्यात जमा करण्यात आले होते.आता डिसेंबर चे पैसे कधी येणार याकडे लाडक्या बहिणीच्या नजरा लागल्या असताना हमीपत्र आता त्यांची डोकेदुखी वाढवणार आहे..

जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात आले.या योजनेचे अंमलबजावणी करत जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा ही करण्यात आले.. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार सत्तेवर आणण्यात ही योजना गेम चेंजर ठरली.. सत्तेत आल्यानंतर पंधराशे ऐवजी 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन या सरकारने केले.. मात्र आता होत असलेल्या अर्जांच्या पडताळणीनुसार महिलांची धाकधूक वाढली आहे..

Tags: bjpmaharashtra
Previous Post

महायुतीच्या मंत्रीपदाचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी ; तोडगा निघणार?

Next Post

सरकारला जाग केव्हा येणार? वक्फ बोर्डाचा १०३ शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा!

Next Post
सरकारला जाग केव्हा येणार? वक्फ बोर्डाचा १०३ शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा!

सरकारला जाग केव्हा येणार? वक्फ बोर्डाचा १०३ शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!