• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पावसाळ्यात वाहन चालवताना घाई करू नका – शाम लोही

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 11, 2021
in जळगाव
0
पावसाळ्यात वाहन चालवताना घाई करू नका – शाम लोही
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्यात सर्वदूर राष्ट्रीय महामार्ग तथा राज्य महामार्गाची कामे सुरु आहेत तर बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. रस्ते गुळगुळीत व खड्डेविरहीत झाल्यामुळे बऱ्याचदा वाहनचालकांना वेग वाढविण्याचा मोह आवरत नाही. वाहनचालकांनी वेग मर्यादेचे भान ठेवून व स्वत:चे वाहन नियंत्रणात ठेवून अशा रस्त्यांवर वाहन चालविणे ही काळाची गरज असून पावसाळ्यात वाहन चालवितांना आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे असे आवाहन उपप्रादेशिक परीवहन अधिकारी शाम लोही यांनी केले.

नागरीकांनी शक्यतो पावसाळयात अनावश्यक प्रवास टाळावा, पावसाळयात अनेक अडचणी येत असल्याने प्रवासाचा कालावधी वाढून पोहोचण्याची वेळही वाढते. त्यामुळे वाहन चालवितांना घाई होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. जेव्हा खराब हवामान असते तेव्हा रस्त्यावर चिन्हाद्वारे दर्शविण्यात आलेली वेग मर्यादा ही धोकादायक ठरु शकते. पहिल्या पावसात रस्त्यावर सांडलेले गाडीचे तेल, डिझेल, ग्रीस व इतर स्निग्ध पदार्थांमुळे रस्ता निसरडा होत असतो. यामुळे वाहनांच्या चाकांची रस्त्याबरोबर आवश्यक असणारी पक्कड कमी होते व वाहन घसरण्याची शक्यता असते.

खराब हवामानात दोन वाहनांमध्ये पुरेसे अंतर ठेवावे. यामुळे इतर वाहन चालकांना त्यांचे वाहन नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे अंतर मिळेल. खराब हवामानात जी अडचण तुम्हास भेडसावते त्याच अडचणी तुमच्या पुढील अथवा मागच्या वाहनचालकास भेडसावतात, यासाठी दोन वाहनांमध्ये तीन सेकंदाऐवजी सहा सेकंदाचे अंतर ठेवा.

रस्त्यावरुन पाणी वाहत असेल तर वाहन त्यामधून चालवू नका. अन्यथा पाण्याच्या प्रवाहामुळे आपले वाहन वाहून जावू शकते. आपल्या वाहनाचे दिवे सुस्थितीत असल्याची खात्री करा. पावसाळयात धुक्यामुळे तसेच सुर्यप्रकाश कमी असल्यामुळे दूरपर्यत दिसत नाही. जसे आपणास दिसत नाही तसेच इतर वाहन चालकांना देखील दिसत नाही याचेही भान आपणास असणे आवश्यक आहे.

वाहनाच्या यांत्रिक स्थितीबाबत थोडी जरी शंका आल्यास ताबडतोब आपले वाहन कंपनीच्या अधिकृत दुरुस्ती केंद्रात पाठवावे. कंपनीने विहित केल्याप्रमाणे दर दहा अथवा पंधरा हजार कि.मी प्रवास केल्यानंतर वाहनाचे सर्व्हिसिंग करुन घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी म्हटले आहे.

Tags: bhajap taluka upadhyakshajalgaonpavsalashyam lohi
Previous Post

जनमत प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीर संपन्न

Next Post

राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत जळगावची सानिया तडवी पाचवी

Next Post
राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत जळगावची सानिया तडवी पाचवी

राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत जळगावची सानिया तडवी पाचवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!