• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मिशन मुंबई ; ठाकरे गट आगामी मनपा निवडणुका स्वबळावर लढणार?

Team Rajmudra by Team Rajmudra
January 9, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
ठाकरेंना धक्क्यावर धक्के : राजन साळवीनंतर आता माजी नगरसेवकही भाजपच्या वाटेवर
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होत . हा पराभव आता नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकांचे वेध सर्वांना लागले आहेत.. या मनपा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असून यासाठी आता शिवसेना उद्धव ठाकरे गट ही सज्ज झाला आहे.. संपूर्ण तयारीने मैदानात उतरण्याची तयारी ठाकरे गटाने केली असून या निवडणुका स्वबळावर लढण्याची शिवसैनिकांची मागणी होत आहे. त्यामुळे आगामी मनपा निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार का?हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आता “मिशन मुंबई “वर केंद्रित केलं असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गेल्या महिन्यात, 26 व 27 डिसेंबर रोजी मातोश्री येथे मुंबईतील 16 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला होता. तर त्यानंतरही त्यांनी 14 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. एवढंच नव्हे तर ते आज ( गुरूवार 9 जानेवारी) दक्षिण मुंबईतील 6 विधानसभा मतदारसंघांचाही आढावा घेणार आहेत.. या निवडणुकीत मुंबईवर आपली सत्ता राखून ठेवण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार कंबर बसली आहे..

विधानसभा निवडणुकीचा पराभव मनावर न घेता आगामी मनपा निवडणुका स्वबळावर लढवावी अशी शिवसैनिकांची मागणी आहे असा अहवाल उद्धवसेनेच्या पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून घेतला आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विधानसभा संघटक यांच्यासोबत बैठक घेऊन संघटनात्मक आढावा घेतला आहे. या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा सूर उमटवला असल्याची माहिती समोर आली आहे..

मनपा निवडणूक लढवण्यासाठी कोणासोबत ही युती किंवा आघाडी न करता स्वबळावर ही निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.. त्यामुळे मनपा निवडणुकीत ठाकरे गट बाजी मारणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags: maharashtrashivsenauddhav thakre
Previous Post

अजितदादांच्या भेटीनंतर सुरेश धस म्हणाले ; “मी धनंजय मुंडे यांचा…..?

Next Post

धनंजय मुंडेकडून मंत्रीपद वाचवण्यासाठी फिल्डिंग ; वरिष्ठांसोबत भेटीगाठी वाढवल्या?

Next Post
धनंजय मुंडेकडून मंत्रीपद वाचवण्यासाठी फिल्डिंग ; वरिष्ठांसोबत भेटीगाठी वाढवल्या?

धनंजय मुंडेकडून मंत्रीपद वाचवण्यासाठी फिल्डिंग ; वरिष्ठांसोबत भेटीगाठी वाढवल्या?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!