• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात ; कॉपी टाळण्यासाठी बोर्डाचा कठोर निर्णय

Team Rajmudra by Team Rajmudra
February 11, 2025
in महाराष्ट्र
0
आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात ; कॉपी टाळण्यासाठी बोर्डाचा कठोर निर्णय
Spread the love

राजमुद्रा : राज्यात आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. या परीक्षेतील कॉपीचा गैरप्रकार टाळण्यासाठी बोर्डाने कठोर निर्णय घेतला आहे. कॉपी प्रकार टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठी जीपीएसद्वारे लाइव्ह ट्रॅकिंग होणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणही होणार आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वर करडी नजर असणार आहे.

. राज्यातील 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी राज्यातील 3 हजार 373 केंद्र तयार करण्यात आली आहेत. या परीक्षेसाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी बोर्डाने काही कठोर निर्णय घेतले आहेत. बारावीची परीक्षा ही पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकातील अधिकारी कोणत्या परीक्षा केंद्रावर कधीही धाड टाकू शकतात. या धाडीत एखादा विद्यार्थी किंवा शिक्षक दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

या परीक्षेसाठी आता बोर्ड सज्ज झाले असून परीक्षा केंद्रांपासून 500 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येणार आहे. यानंतरही परीक्षा केंद्रावर गैर प्रकार घडल्यास कॉपीसाठी मदत करणाऱ्यांवर दखल पात्र आणि अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Tags: maharashtraआजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात
Previous Post

राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या “संविधान “विषयीच्या वक्तव्याने नवा वाद पेटणार?

Next Post

ठाकरेंच्या शिलेदारांनीं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण?

Next Post
ठाकरेंच्या शिलेदारांनीं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण?

ठाकरेंच्या शिलेदारांनीं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!