• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकसभा राज्यसभेत आठवडाभरानंतरही गोंधळ कायम, दोन्ही सभा दुसऱ्यांदा तहकूब

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 26, 2021
in राजकीय, शासकीय
0
लोकसभा राज्यसभेत आठवडाभरानंतरही गोंधळ कायम, दोन्ही सभा दुसऱ्यांदा तहकूब
Spread the love

 

राजमुद्रा वृत्तसेवा | संसदचे पावसाळी अधिवेशन सुरु होऊन एक आठवडा होऊन गेला असला तरी सभागृहात गोंधळ कायम असून आज सोमवारीही सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात गोंधळापासून झाली आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे कामकाज दुपारी २:४५  वाजेपर्यंत तर राज्यसभेचे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. विशेष म्हणजेच आज दुसऱ्यांदा या दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

संसेदच्या दोन्ही सभागृहात एकही दिवस व्यवस्थित काम झाले नाही. विरोधी पक्ष पेगासस प्रकरण, शेतकरी आंदोलन आणि भास्कर समुहावरील छापेमारीवरुन सरकार हल्लाबोल करत आहे. लोकसभा आणि राज्यसभेने जारी केलेल्या नोटिसांनुसार, केंद्र सरकारने या आठवड्यातील कामकाजासाठी पाच अध्यादेशांची यादी केली आहे. यामध्ये होमिओपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) अध्यादेश, भारतीय औषध केंद्रीय परिषद (दुरुस्ती) अध्यादेश, राष्ट्रीय राजधानी आणि आजूबाजूच्या क्षेत्रातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग अध्यादेश, दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) अध्यादेश आणि आवश्यक संरक्षण सेवा अध्यादेश यांचा समावेश आहे.

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले. “मी शेतकऱ्यांचा संदेश घेऊन संसदेत जात असून सरकारने शेतकऱ्यांचे ऐकले पाहिजे. सरकार शेतकऱ्यांचा आवाज दडपला जात आहे.” असा आरोप त्यांनी केला आहे.
कामाकाजाच्या सुरुवातील राजसभा सदस्यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्धाच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल लोकसभा आणि राज्यसभेने वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचे अभिनंदन केले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, मीराबाई चानू यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले हे तुम्हाला सांगताना मला खूप आंनद होत आहे. सभागृहाच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो. मला आशा आहे की, इतर खेळाडू देखील आपापल्या खेळात चांगली कामगिरी करतील आणि देशाचा नाव मोठे करतील असे ओम बिर्ला म्हणाले.

Tags: delhiloksabhaom birlapavsali adhiveshanrajyasabha
Previous Post

कृषी मंत्री दादा भुसे यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन

Next Post

पूरग्रस्त भागात रोगराई वाढण्याची भीती, मेडीकल कॅम्प उभारले जाणार – अमित देशमुख

Next Post
पूरग्रस्त भागात रोगराई वाढण्याची भीती, मेडीकल कॅम्प उभारले जाणार – अमित देशमुख

पूरग्रस्त भागात रोगराई वाढण्याची भीती, मेडीकल कॅम्प उभारले जाणार - अमित देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!