• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नैसर्गिक आपत्तीसाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज – देवेंद्र फडणवीस

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 31, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
नैसर्गिक आपत्तीसाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज – देवेंद्र फडणवीस
Spread the love

 

कराड राजमुद्रा वृत्तसेवा | भूगर्भात काही हालचाली होत असल्याचा अभ्यास करावा लागेल. भूस्खलन व नैसर्गिक आपत्ती हे सखोल संशोधनाचे विषय बनले असून, त्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आराखडय़ाची स्वतंत्र मंत्रालयाचीही गरज असल्याची सूचना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पश्चिम घाटातील अतिवृष्टी आणि दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले आदी उपस्थित होते.

नियमबाहय वाढते नागरीकरण तसेच तीन दिवसांत वर्षांचा आणि एका दिवसात महिन्याचा पाऊस पडू लागल्याबाबत फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. दोन वर्षांत राज्यावर तीनवेळा नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे आपत्तींचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येत आहे. परिणामी शासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. आपण मुख्यमंत्री असताना जागतिक बँकेच्या सहाय्याने धरणे, नद्यांचे पाणी कालव्याने दुष्काळी भागांना देण्याची योजना आखली होती. ही योजना पूर्ण होण्यास सात वर्षे लागली असती. मात्र, यापेक्षा दुसरा कोणताही पर्याय सद्याच्या स्थितीत दिसत नाही. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर शासनाकडे अनेक अभ्यासक तसेच तज्ज्ञांचे अहवाल येतात. मात्र, त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

Tags: deevdra fadnaviaskaradpravin darekarpurparisthiti
Previous Post

शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला

Next Post

सर्व शिवरस्त्यांच्या डांबरीकरणाला प्राधान्य देणार – ना. गुलाबराव पाटील

Next Post
अन… गुलाबराव पाटील “ऐऱ्या गैऱ्या नथ्थू खैऱ्यांवर” बरसले..!

सर्व शिवरस्त्यांच्या डांबरीकरणाला प्राधान्य देणार - ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!