• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगभरात पूरस्थिती आहे मात्र तिथल्या महापालिका आमच्या ताब्यात नाहीत – मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 5, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
जगभरात पूरस्थिती आहे मात्र तिथल्या महापालिका आमच्या ताब्यात नाहीत – मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला
Spread the love

 

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांना बसलेला पावसाचा जोरदार तडाखा, मुंबईची पहिल्याच पावसानं झालेली परिस्थती या प्रकारामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू केली आहे. मुंबईत दरवर्षीच्या पावसामुळे साचणाऱ्या पाण्यामुळे आणि निर्माण होणाऱ्या पूरसदृश्य स्थितीमुळे विरोधकांनी सरकारवर अनेकदा परखड शब्दांमध्ये टीका केल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. मुंबईप्रमाणेच जगभरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तिथल्या महापालिका आमच्या ताब्यात नाहीयेत, असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.

मुंबईतील एच पश्चिम विभागामधील वॉर्ड ऑफिसच्या इमारतीत झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी पालिका अधिकाऱ्यांचा आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या संकटाविषयी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली.

“मुंबईवर नैसर्गिक आपत्ती यायच्या त्या येतच आहेत. सध्या एक नवीन संकट आहे. काही दिवसांचा, काही महिन्यांचा पाऊस काही तासांत पडतोय. पूरस्थिती मुंबईतच नाही, जगभर निर्माण होतेय. तिथे तर महापालिका काही आमच्या ताब्यात नाहीयेत. बीजिंग किंवा जिथे कुठे जगभरात पूर आले, त्या महापालिका काही आमच्या ताब्यात नाहीयेत. पण तिथेही पूर आले. आता त्याला जबाबदार कोण? हे तिथे कोण असतील ते बोलत असतील”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“ज्या प्रमाणे ही पुराची आपत्ती आली, त्यावेळी स्थानिक प्रशासनाने ४ लाखांहून जास्त नागरिकांचं स्थलांतर केलं, म्हणून सुदैवाने मोठी प्राणहानी टळली. दुर्दैवाने काही प्रमाणात तिथे प्राणहानी झाली. चिपळूण, महाड, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी पूर आला. तिथे देखील मुंबई पालिकेने आपल्या टीम पाठवून तिथल्या नागरिकांना देखील मदत केली”, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Tags: mukhyamantri uddhav thakremumbaipurparisthiti
Previous Post

खोटे मस्टर रंगवले – रंगेहात पकडले ; अटकेसाठी मोर्चे बांधणी

Next Post

श्रेय घेण्याच्या नादात सत्ताधारी काय करतील याचा नेम नाही – आशिष शेलार

Next Post
श्रेय घेण्याच्या नादात सत्ताधारी काय करतील याचा नेम नाही – आशिष शेलार

श्रेय घेण्याच्या नादात सत्ताधारी काय करतील याचा नेम नाही – आशिष शेलार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!