• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 12, 2021
in जळगाव
0
Spread the love

(राजमुद्रा, जळगाव) आगामी मान्सुन कालावधीत जिल्ह्यात आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवून परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी केले आहे.

जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सून पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईनरित्या संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंह रावळ हे उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनात सांगितले की महसुल विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, शोध व बचाव साहित्याची तपासणी करुन सर्व साहित्य सुस्थितीत ठेवावे, मान्सुनकाळात आपत्ती प्रवणक्षेत्रात पुरेसा धान्यसाठा व वितरण करण्याचे नियोजन करावे. अंत्योदय योजनेतंर्गत लाभार्थ्यांना मान्सुन काळात धान्य पुरवठ्याचे नियोजन करावे. आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांबाबत पुरेसा औषधसाठा करुन ठेवावा. आवश्यक औषधसाठ्याची मागणी नोंदवावी, जलजन्य व किटकजन्य आजार होवू नयेत याबाबत दक्षता घ्यावी. पाटबंधारे विभागाने धरणनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन पुररेषा निश्चित करावी. धरणातून विसर्ग सुरु करणार असल्यास त्याबाबतची माहिती दवंडी, सायरण यंत्रणेद्वारे द्यावी, हवामान खात्याकडून येणारे संदेश शेतकऱ्यांना वेळेत पोहोचविण्याचे काम कृषि विभागाने करावे. बांधकाम विभागाने रस्त्यांवरील पुल, पडणारी झाडे तसेच पाझरतलाव यांची पाहणी करुन घ्यावी तर नगरपालिकांनी आपल्याकडील अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावी, वीज वितरण कंपनीने लोंबकळणाऱ्या तारा, उघडे ट्रान्सफार्मर, धोकेदायक पोल यांची दुरुस्ती करावी. आपत्तीच्या काळात कोणीही पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाही याची सर्व संबधित विभागांनी दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वाना दिले आहेत.

Tags: aapatii vyavsthapanjalgaonjilhadhikari abhijit rautrajmudra
Previous Post

चार व सात वर्षाच्या जामनेरच्या बहिणींची कोरोनवर मात

Next Post

मे आणि जून महिन्याचे रेशन एकत्र वाटप करण्याची गुप्ता यांची मागणी

Next Post

मे आणि जून महिन्याचे रेशन एकत्र वाटप करण्याची गुप्ता यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!