• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

असदुद्दीन ओवैसींचे मोहन भागवतांना आव्हान; म्हणाले त्यांनी सर्वांसमोर मान्य करावे…!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 17, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
असदुद्दीन ओवैसींचे मोहन भागवतांना आव्हान; म्हणाले त्यांनी सर्वांसमोर मान्य करावे…!
Spread the love

राजमुद्रा वृत्तसेवा | भारतीय अर्थव्यवस्था नोटबंदीमुळे उद्ध्वस्त झाली आहे अशी टीका खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर केली आहे. तर, ‘तुम्हीच खरे देशभक्त’ असं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला. भारताने आत्मनिर्भर व्हावं, असं मोहन भागवतांनी म्हटलं होतं. यावरून त्यांनी भागवतांना सुनावलंय. चीनचे सैन्य भारताच्या हद्दीत घुसून बसले आहेत, हे खरे देशभक्त या नात्याने भागवत यांनी मान्य करावे, असं ओवैसी म्हणाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांची विचारसरणी आरएसएसची आहे, ते चीन विरोधात चकार काढायलाही घाबरतात. त्यामुळे जर भागवत हे खरे देशभक्त आहेत तर, त्यांनी सर्वांसमोर येऊन चीनी सैन्याने भारतात घुसखोरी हे मान्य करावं, असं आव्हान त्यांनी भागवतांना दिलं.

“मोहन भागवत म्हणतात की कोणत्याच गोष्टीसाठी आपण चीनवर विसंबून राहायला नको. मग भारतात नोटाबंदी करून देशाची अर्थव्यवस्था कोणी उद्ध्वस्त केली?, देशातील आर्थिक स्थितीला कोण जबाबदार आहे?, केवळ आणि केवळ मोदी सरकार जबाबदार आहे. करोना महामारीत मोदी सरकारनं जनतेसाठी आणलेल्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालंय. मोहन भागवत तुम्हाला देशातील जनतेची ही स्थिती बघवत आहे का, असा सवाल करत भागवत यांचं विधान बोगस आहे,” अशी टीका ओवैसींनी केली.

चीनी सैनिक भारतात घुसून बसले आहेत ही वास्तविकता आहे आणि ती मोहन भागवतांना दिसत नाही.  देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आहे. नोटाबंदीचे दुष्परीणाम देश अद्यापही भोगत असल्याचं ओवैसी म्हणाले.

मोहन भागवत एका कार्यक्रमात बोलतांना म्हणाले होते की, “देशाने आत्मनिर्भर व्हायला हवं. आपण जेवढं आत्मनिर्भर असू तेवढेच सुरक्षित असू. आपण किती कमवतो यावर आपलं राहणीमान निर्भर नसावं तर, आपण किती कर भरतोय यावर निर्भर असावं.” यावर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आपली भावना व्यक्त केली.

Tags: asduddin ovesiindiamohan bhagvatnarendra modi
Previous Post

राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस

Next Post

जळगावात सापडले १२ डेंग्यू सदृश्य रुग्ण

Next Post
जळगावात सापडले १२ डेंग्यू सदृश्य रुग्ण

जळगावात सापडले १२ डेंग्यू सदृश्य रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!